उस्मानाबाद -: कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. कारगिल (ऑपरेशन विजय) युध्दात मिळालेल्या विजयास दिनांक 26 जुलै 2013 रोजी चौदा वर्षे पुर्ण होत असून त्यानिमित्त 14 वा विजय दिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
        या दिवशी सकाळी 8 ते 9 वाजता शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी,  सकाळी 9-30 वजता जिल्हाधिकारी डॅा. के.एम. नागरगोजे यांच्या हस्ते नगर परिषद येथील स्मृतीस्तंभास अभिवादन करण्यात येईल. या दिवशी शहर व जिल्हावासीयांनी आपापल्या घरांसमोर रांगोळ्या काढाव्यात, दीपप्रज्वलन करावे, घरांवर रोषणाई करावी व कारगिल विजय दिवस साजरा करावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी, उस्मानाबाद आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) श्री. सासणे, उस्मानाबाद यांनी केले आहे
 
Top