उस्मानाबाद :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, उस्मानाबादच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र दि. 22 सप्टेंबर रोजी महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय तसेच प्रत्येक तालुका न्यायालयात ही महालोकअदालत होणार आहे. या न्यायालयात प्रलंबीत असलेले मोटार अपघात/ कामगार नुकसान भरपाई प्रकरणे/ दिवाणी प्रकरणे तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भूसंपादन  प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे आदी तडजोडीने मिटविण्याकरीता ठेवण्यात येणार आहेत. 
    तरी संबंधित पक्षकारांनी त्यांची वरीलपैकी प्रलंबीत असणारी प्रकरणे या महा लोकअदालतीमध्ये ठेवून मिटवून घ्यावीत आणि न्यायालयात खर्ची पडत असलेला बहुमुल्य वेळ व पैशाची बचत करावी, असे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश पी. बी. मोरे उस्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top