मुंबई : उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस झाल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली. याचबरोबर मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमास मान्यता, चाकूर येथील पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या पदनिर्मितीस मान्यता, जैविक उत्पादन युनिट उभारणीस अर्थसहाय्य देणे, मनरेगासाठी स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण संचालनालय आदी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे :
उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस
राज्यात उस्मानाबादचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 310 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक तर 36 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के, नऊ तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला. एकंदर राज्यात 1118.30 मि. मी. म्हणजेच सरासरीच्या 140.7 टक्के पाऊस झाला आहे.
धरणातील पाणी साठा 74 टक्के
राज्यातील विविध जलाशयात पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून सध्या 74 टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 49 टक्के पाणी साठा होता.
आजची स्थिती पुढीलप्रमाणे :- कोकण 91 टक्के (गतवर्षी 81 टक्के), मराठवाडा 43 टक्के (गतवर्षी नऊ टक्के), नागपूर 72 टक्के (गतवर्षी 51 टक्के), अमरावती 85 टक्के (गतवर्षी 55 टक्के), नाशिक 60 टक्के (गतवर्षी 42 टक्के), पुणे 87 टक्के (गतवर्षी 59 टक्के) इतर धरणांमध्ये 92 टक्के (गतवर्षी 77 टक्के). मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणी साठा होण्यास सुरुवात झाली असून जायकवाडीमध्ये 23 टक्के साठा झाला आहे.
पेरणीची कामे वेगात
राज्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 134.69 लाख हेक्टर असून, 139.70 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण, कोल्हापूर व पुणे विभागात भात पुनर्लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. खरीपासाठी बियाणांची गरज निश्चित करण्यात आली असून 95 टक्के बियाणे पुरवठा झाला आहे. खतांच्या बाबतीतही 107 टक्के पुरवठा करण्यात आला आहे.
टँकर्सच्या संख्येत घट
एकंदर 774 गावे आणि 4196 वाड्यांना 1014 टँकर्स पाणी पुरवठा करीत आहेत. गेल्या वर्षी याच सुमारास 1862 टँकर्स होते.
केवळ चार जिल्ह्यात जनावरांच्या छावण्या
सध्या राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर अशा चार जिल्ह्यांमध्ये मिळून जनावरांच्या 241 छावण्या आहेत. त्यामध्ये एक लाख 69 हजार 776 मोठी आणि 21 हजार 053 लहान अशी एक लाख 90 हजार 829 जनावरे आहेत. टंचाई परिस्थितीत लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली एकूण 11 हजार 445 कामे सुरु असून या कामावर 83 हजार मजूर काम करीत आहेत.
मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमास मान्यता
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव मत्स्य महाविद्यालयात मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास आज मत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अभ्यासक्रमाकरीता शिक्षकवर्गीय नऊ व शिक्षकेत्तर 39 पदे अशी एकूण 48 पदे भरण्यात येतील. त्याचप्रमाणे 20 ऐवजी 30 प्रवेश क्षमता ठेवण्यास देखील मान्यता देण्यात आली. या पदांसाठी एकूण आवर्ती तसेच अनावर्ती असा मिळून 42 कोटी 78 लाख 87 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या पदनिर्मितीस मान्यता
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत चाकूर (जि.लातूर) येथील पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी शिक्षक वर्गीय 21 पदे व शिक्षकेत्तर 17 पदे अशी एकूण 38 पदे निर्माण करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या पदांसाठी एकूण आवर्ती तसेच अनावर्ती असा मिळून 26 कोटी 27 लाख 86 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
जैविक उत्पादन युनिट उभारणीस अर्थसहाय्य देण्याचा निर्णय
राज्य पुरस्कृत जैविक खत उत्पादन युनिट उभारणीस अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेसाठी 2013-14 मध्ये रु. 250 लक्ष व 2013-14 ते 2017-18 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी रु.1250 लक्ष इतक्या रकमेची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.
ही योजना त्या-त्या वर्षी उपलब्ध असलेल्या खर्चाच्या मर्यादेत राबविण्यात येणार असून योजना घेताना ज्या जिल्ह्यात एकही युनिट नाही त्या जिल्ह्याला आधी मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर इतर जिल्ह्यांचा विचार करण्यात येईल. राज्य शासनाच्या औद्योगिक धोरण अंतर्गत देय अनुदान लक्षात घेता अनुदानाची एकूण मर्यादा 25 टक्के पर्यंत असेल.
मनरेगासाठी स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण संचालनालय
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचे दर सहा महिन्यांनी सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी राज्यात स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण संचालनालय तसेच त्यासाठी संचालक व सह संचालक अशी दोन पदे निर्माण करण्याचा निर्णय झाला. रोहयो कामांचे नियोजन व सुसूत्रता करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्याच्या कायद्यात तरतूद आहे. त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस
राज्यात उस्मानाबादचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 310 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक तर 36 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के, नऊ तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला. एकंदर राज्यात 1118.30 मि. मी. म्हणजेच सरासरीच्या 140.7 टक्के पाऊस झाला आहे.
धरणातील पाणी साठा 74 टक्के
राज्यातील विविध जलाशयात पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून सध्या 74 टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 49 टक्के पाणी साठा होता.
आजची स्थिती पुढीलप्रमाणे :- कोकण 91 टक्के (गतवर्षी 81 टक्के), मराठवाडा 43 टक्के (गतवर्षी नऊ टक्के), नागपूर 72 टक्के (गतवर्षी 51 टक्के), अमरावती 85 टक्के (गतवर्षी 55 टक्के), नाशिक 60 टक्के (गतवर्षी 42 टक्के), पुणे 87 टक्के (गतवर्षी 59 टक्के) इतर धरणांमध्ये 92 टक्के (गतवर्षी 77 टक्के). मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणी साठा होण्यास सुरुवात झाली असून जायकवाडीमध्ये 23 टक्के साठा झाला आहे.
पेरणीची कामे वेगात
राज्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 134.69 लाख हेक्टर असून, 139.70 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण, कोल्हापूर व पुणे विभागात भात पुनर्लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. खरीपासाठी बियाणांची गरज निश्चित करण्यात आली असून 95 टक्के बियाणे पुरवठा झाला आहे. खतांच्या बाबतीतही 107 टक्के पुरवठा करण्यात आला आहे.
टँकर्सच्या संख्येत घट
एकंदर 774 गावे आणि 4196 वाड्यांना 1014 टँकर्स पाणी पुरवठा करीत आहेत. गेल्या वर्षी याच सुमारास 1862 टँकर्स होते.
केवळ चार जिल्ह्यात जनावरांच्या छावण्या
सध्या राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर अशा चार जिल्ह्यांमध्ये मिळून जनावरांच्या 241 छावण्या आहेत. त्यामध्ये एक लाख 69 हजार 776 मोठी आणि 21 हजार 053 लहान अशी एक लाख 90 हजार 829 जनावरे आहेत. टंचाई परिस्थितीत लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली एकूण 11 हजार 445 कामे सुरु असून या कामावर 83 हजार मजूर काम करीत आहेत.
मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमास मान्यता
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव मत्स्य महाविद्यालयात मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास आज मत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अभ्यासक्रमाकरीता शिक्षकवर्गीय नऊ व शिक्षकेत्तर 39 पदे अशी एकूण 48 पदे भरण्यात येतील. त्याचप्रमाणे 20 ऐवजी 30 प्रवेश क्षमता ठेवण्यास देखील मान्यता देण्यात आली. या पदांसाठी एकूण आवर्ती तसेच अनावर्ती असा मिळून 42 कोटी 78 लाख 87 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या पदनिर्मितीस मान्यता
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत चाकूर (जि.लातूर) येथील पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी शिक्षक वर्गीय 21 पदे व शिक्षकेत्तर 17 पदे अशी एकूण 38 पदे निर्माण करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या पदांसाठी एकूण आवर्ती तसेच अनावर्ती असा मिळून 26 कोटी 27 लाख 86 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
जैविक उत्पादन युनिट उभारणीस अर्थसहाय्य देण्याचा निर्णय
राज्य पुरस्कृत जैविक खत उत्पादन युनिट उभारणीस अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेसाठी 2013-14 मध्ये रु. 250 लक्ष व 2013-14 ते 2017-18 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी रु.1250 लक्ष इतक्या रकमेची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.
ही योजना त्या-त्या वर्षी उपलब्ध असलेल्या खर्चाच्या मर्यादेत राबविण्यात येणार असून योजना घेताना ज्या जिल्ह्यात एकही युनिट नाही त्या जिल्ह्याला आधी मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर इतर जिल्ह्यांचा विचार करण्यात येईल. राज्य शासनाच्या औद्योगिक धोरण अंतर्गत देय अनुदान लक्षात घेता अनुदानाची एकूण मर्यादा 25 टक्के पर्यंत असेल.
मनरेगासाठी स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण संचालनालय
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचे दर सहा महिन्यांनी सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी राज्यात स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण संचालनालय तसेच त्यासाठी संचालक व सह संचालक अशी दोन पदे निर्माण करण्याचा निर्णय झाला. रोहयो कामांचे नियोजन व सुसूत्रता करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्याच्या कायद्यात तरतूद आहे. त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.