उस्मानाबाद -: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नगर येथून पालखी घेऊन येणार्‍या मानकर्‍यांना ओळखपत्र द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.
    यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव विविध रुढी, परंपरा व रितीरिवाजाप्रमाणे दरवर्षी पार पडत असतो. या महोत्सवात पलंग-पालखी घेऊन येण्याचा मान नगर जिल्ह्यातील जितेंद्र जगदीश भगत (पालखीवाले), जयंत रत्नाकर भगत, उमेश रविंद्र भगत, जीवन रत्नाकर भगत, रामकृष्ण प्रभाकर भगत, सचिन सुरेंद्र भगत यांना आहे. गतवर्षी तुळजापुरातील देवीचे भोपे पुजारी व भगत कुटुंबीयाचे मंदिरातील प्रवेशाबाबत तंटे झाले होते. तसा प्रकार यावर्षी घडू नये म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी या मानकर्‍यांना फोटो ओळखपत्र द्यावे, अशी मागणी भगत कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे.
 
Top