उस्मानाबाद :- शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या भाजीपाला व शेतीमालास योग्य भाव मिळावा, शेतकरी व ग्राहकांची आर्थीक बचत व्हावी व ग्राहकांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा या हेतूने कृषी विभाग, आत्माअंतर्गत शेतकरी ते  ग्राहक थेट शेतीमाल विक्री  केंद्र येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात सुरु करण्यात आले या केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार एस. एल. हरिदास यांच्या हस्ते झाले.
     याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी विकास अधिकारी, शंकर तोटावार, आत्माचे व्ही. एम. हिरेमट, तालुका कृषी अधिकारी ए. पी. जाधव, नाबार्डचे देशपांडे  यांचेसह कृषी  विभागाचे अधिकारी, कर्मचारी व  शेतकरी, कृषीमाल उत्पादक आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
   यावेळी जुनोनी येथील दिलीप मुळे, कुमाळवाडीचे प्रदिप  रणसुबे,चिखलीचे सुर्यकांत जाधव, विठल कोळेकर आदि शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या वांगी, मिरची, दोडका, टॅमाटो आदि पालेभाज्या व्रिक्रीस आणल्या होत्या. या विक्री  केंद्रात बाजारभापेक्षा  योग्य दरात कृषी मालाचे विक्री होत असल्याने ग्राहकांची गर्दी दिसून आली. अशा  प्रकारचे थेट कृषी मालाचे विक्री केंद्र भूम येथील  नगर परिषदेजवळ सुरु करण्यात आले असून त्यासह चांगला प्रतिसाद मिळत असल्याची  कृषी विकास अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
 
Top