उस्मानाबाद :- उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामपंचायत येथे आयोजित जनमाहिती जागर कार्यक्रमाचे उदघाटन  खासदार पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
          निर्मल भारत अभियानाला गती मिळावी व जनतेत स्वच्छेतेविषयी जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी जिलहा समन्वयक तथा जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांच्या मार्गदर्शनखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत राबविण्यात येणार असून जनमाहितीचा जागर कार्यक्रम जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. एस. एल. हरिदास यांनी दिली.   
             नियमित दोन गावात 7 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचेसह विषय समितीचे सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य  तालुकास्तरीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी हिरीरीने सहभाग होत आहेत. 
           ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व वापरकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी 106 ग्रामपंचायती निर्मलमय होण्यासाठी सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जनतेत  जाणीव जागृती व्हावी यासाठी ग्रामस्तरावर सतत तीन दिवस दवंडी देवून सकाळी शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, शाळेत हातधुवा अभियान  राबविण्यात येणार आहे. विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन  गृहभेटीव्दारे कुटुंबाना पिण्याचे पाणी हाताळणी व लहान मुलांच्या विष्टेची योग्य विल्हेवाट लावणे, मशालफेरी व शौचालय बांधलेल्या कुटुंबाचा सत्कार करण्यातही  करण्यात  येणार आहे.
        जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ञ रमाकांत गायकवाड, हनुमंत गादगे, शोभा टेकाळे, अश्विनी अकुसकर व संतोष गुळमिरे गट संधाधन केंद्रातील पाणी व स्वच्छता समन्वयक हे ग्रामस्थांशी संवादन साधून शौचालय बांधकामाचे ग्रामस्थांना महत्व पटवून सांगत असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी दिली. 
 
Top