नवी दिल्ली : गूगलने दहा सर्वोत्कृष्ट आयडिया निवडल्या आहेत. यातील चार आयडियांना पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कार म्हणून चारही आयडियांना प्रत्येकी 3 कोटी रूपये दिले जाणार आहेत.
     अंतिम 10 प्रोजेक्टसाठी ग्रामीण भागातील शिक्षण, कृषिविकास आणि स्वच्छता यांचा समावेश आहे. यातील एक आयडिया मोटरबाईक सायन्सशी निगडीत आहे. ही लॅब ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा हेतू समोर ठेऊन तयार करण्यात आली आहे.
    यावर्षी ऑगस्ट महिन्यात गूगलने सर्वोत्कृष्ट आयडिया मागितली होती. या आयडियानुसार भारत आणि जगातला टेक्नॉलॉजीच्या मदतीने सर्वोत्कृष्ट बनवू शकेल. निवडलेल्या आयडियांमधून एक आयडिया अशीही आहे की, शेतकऱ्यांना शेतीसंबंधी माहिती देण्यात यावी, शेतकऱ्यांना त्याविषयी प्रशिक्षण देण्यात यावं, कमीत कमी भांडवल वापरून जास्तच जास्त उत्पन्न कसं घेता येईल यावर भर देण्यात आला आहे.
    दुस-या आयडियानुसार मुलांना असा एक गेम शिकवला जाईल, ज्यातून त्यांच्यात उद्योजकता वाढीस लागेल. कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय, विजेत्यांना रोख बक्षिस दिल्यानंतर चारही विजेत्यांना गूगलचे मेंटर म्हणून मदत देण्यात येईल.
 
Top