कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची ‘ऐरावतारुढ महालक्ष्मी’ (हत्तीवर रुढ झालेली) रुपात पुजा बांधण्यात आली होती. कोल्हासुराला पराजित केल्यानंतर त्र्यंबोली देवीला विजयोत्सवात बोलविण्याचे राहून गेले. त्यामुळे ती रुसुन टेंबलाई टेकडीवर जाऊन बसली. तिच्या रागाचे शमन करण्यासाठी महालक्ष्मी लवाजम्यासह ऐरावतावर आरुढ होऊन त्र्यंबोली टेकडीकडे गेली. या रुपात बुधवार रोजी श्री महालक्ष्मीची पुजा बांधण्यात आली.