पांगरी (गणेश गोडसे) : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्‍या अपघातात दुचाकीच्या नुकसानीस व एकाच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी एकाविरूदध पांगरी पोलिसात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे.
     अशोक लक्ष्मण धालगुडे (रा.मांगडे चाळ बार्शी, मुळ रा. कडकनाथवाडी जि. उस्मानाबाद) असे अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. तर तुकाराम संभाजी धुमाळ (रा.धामनगांव, ता.बार्शी) असे अपघातातील दुस-या जखमी दुचाकीचालकाचे व अपघातास कारणीभुत ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
       रविवारी दि. 13 रोजी दस-याच्या दिवशी मयत अशोक धालगडे हे कडकनाथवाडी येथुन त्यांच्या चुलत्याचा सावडण्‍याचा कार्यक्रम उरकुन सकाळी साडेदहा वाजण्‍याच्या सुमारास काटेगांव मार्गे आपली दुचाकी क्रमांक एम.एच.13 एटी 5889 वरून बार्शीकडे येत असताना आरोपी तुकाराम संभाजी धुमाळ यांनी त्यांच्या ताब्यातील एमच.13 एएच 7085 ही दुचाकी भरधाव वेगात व रोडच्या परिस्थतीचा विचार न करता चालवुन मयताच्या गाडीला समोरून जोराची धडक दिली. अपघातात अतिरक्त स्त्राव झाल्यामुळे व वेळेवर औषधोपचार उपलब्ध न झाल्यामुळे धालगडे यांचा जागेवरच मृत्यु झाला होता. अपघातानंतर आरोपी तुकाराम धुमाळ हे जखमीला रूग्णालयात न घेऊन जाता व अपघाताची खबर न देता पळुन गेले. अपघात करून खबर न देता एकाच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्‍यात आला असुन याप्रकरणी सुधाकर ठाकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top