पांगरी : बार्शी तालुक्यातील पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाजुन व विजेचा धक्का लागुन वेगवेगळया दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडल्या आहेत. अश्विनी ज्ञानदेव कोंढारे (रा.चिखर्डे, ता.बार्शी) व अशोक संभाजी बारबोले (रा.शेलगांव, ता. बार्शी) असे दोन्ही घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नांवे आहेत.
पहिल्या घटनेत अश्विनी ज्ञानदेव कोंढारे ही महिला अज्ञात कारणावरून गंभिररित्या भाजुन जखमी झाली होती.त्यांना बार्शीच्या ग्रामिण रूग्णालयात उपचरार्थ दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यु झाला.बार्शी येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांनी पांगरी पोलिसात घटनेची खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर दुस-या घटनेत शेलगांव (मा.) येथील अशोक संभाजी बारबोले हे त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांना उपचरासाठी बार्शीच्या जगदाळेमामा रूग्णालयात दाखल केले असता उपचरादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. जगदाळेमामा रूग्णालयाचे वैदयकिय अधिकारी सावंत यांच्या खबरीवरूण पांगरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पांगरी पोलीस करीत आहेत.
पहिल्या घटनेत अश्विनी ज्ञानदेव कोंढारे ही महिला अज्ञात कारणावरून गंभिररित्या भाजुन जखमी झाली होती.त्यांना बार्शीच्या ग्रामिण रूग्णालयात उपचरार्थ दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यु झाला.बार्शी येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांनी पांगरी पोलिसात घटनेची खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर दुस-या घटनेत शेलगांव (मा.) येथील अशोक संभाजी बारबोले हे त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांना उपचरासाठी बार्शीच्या जगदाळेमामा रूग्णालयात दाखल केले असता उपचरादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. जगदाळेमामा रूग्णालयाचे वैदयकिय अधिकारी सावंत यांच्या खबरीवरूण पांगरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पांगरी पोलीस करीत आहेत.