नळदुर्ग : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील नळदुर्ग येथील रोकड्या मारूती घाट वळणात एल. पी. गॅस भरून असलेले टँकर पलटी होऊन चालक व क्लिनर जखमी झाल्याची घटना मंगळवार रोजी घडली. जखमीस सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. गॅस लिकीज न झाल्याने नळदुर्ग शहराचा एक मोठा अनर्थ टळला आहे.
चालक महम्मद साहिल इद्रिस (वय ४०) व क्लिनर ममताज महंमद शाकीर अली (वय २१) दोघे रा. कुशीनगर (उत्तरप्रदेश) असे जखमी झालेल्यांचे नावे आहेत. सोलापूरकडून हैद्राबादकडे जाणारे एल. पी. गॅस भरलेले टँकर (क्र. एम. एच. ४३/वाय/०२०३) नळदुर्गच्या घाट वळणात पलटी झाला. नळदुर्ग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अवघड घाटाच्या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले मोठे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने घटनास्थळापासून केवळ १०० मिटर अंतरावर भिमनगर, बौद्धनगर, कसाई गल्ली असून जर सदर टँकर लिकीज झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र टँकर लिकीज न झाल्याने हा अनर्थ टळला आहे.
सदरील घटना नळदुर्ग येथील पोलिस ठाण्याचे सपोनि. प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ गॅस टँकर असल्याने पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. टँकर रोडवरच पडल्याने कांही काळ वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली होती. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने घडली आहे. महामार्गाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. तात्काळ शासनाने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकातुन होत आहे.
चालक महम्मद साहिल इद्रिस (वय ४०) व क्लिनर ममताज महंमद शाकीर अली (वय २१) दोघे रा. कुशीनगर (उत्तरप्रदेश) असे जखमी झालेल्यांचे नावे आहेत. सोलापूरकडून हैद्राबादकडे जाणारे एल. पी. गॅस भरलेले टँकर (क्र. एम. एच. ४३/वाय/०२०३) नळदुर्गच्या घाट वळणात पलटी झाला. नळदुर्ग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अवघड घाटाच्या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले मोठे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने घटनास्थळापासून केवळ १०० मिटर अंतरावर भिमनगर, बौद्धनगर, कसाई गल्ली असून जर सदर टँकर लिकीज झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र टँकर लिकीज न झाल्याने हा अनर्थ टळला आहे.
सदरील घटना नळदुर्ग येथील पोलिस ठाण्याचे सपोनि. प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ गॅस टँकर असल्याने पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. टँकर रोडवरच पडल्याने कांही काळ वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली होती. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने घडली आहे. महामार्गाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. तात्काळ शासनाने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकातुन होत आहे.