उस्मानाबाद :- पाणलोटाची कामे केल्यास सिंचन क्षेत्रात भरीव वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामात अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन खासदार डॅा. पद्मसिंह पाटील यांनी केले.
मेडसिंगा (ता. उस्मानाबाद) येथे डॅा. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियानाचा शुभारंभ डॅा. पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॅा. सुभाष व्हट्टे होते. जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रभारी जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सरपंच रघुराम आगळे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
तत्पूर्वी, डॅा. पाटील यांच्या हस्ते जीवन आगळे यांच्या शेतात नाला बंडिगच्या कार्यक्रमाने या अभियानास सुरुवात करण्यात आली. डॅा. पाटील म्हणाले की, पाणी हे जपून वापरले पाहिजे. मेडसिंगा येथे एकात्मिक कार्यक्रमातून 4 कोटी 57 लाख रुपयांची विविध कामे सुरु आहेत. लोकसहभाग हा महत्वाचा घटक असून प्रत्येक गावांनी अशाप्रकारे विकास योजनात लोकसहभाग नोंदविल्यास गावे स्वयंपूर्ण होतील.
डॅा. व्हट्टे यांनी पिण्याच्या पाण्याबाबत प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाले पाहिजे. पाणीवापराबाबत जागरुकता येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात तोटावार यांनी, या जनजागृती अभियानाबद्दल माहिती दिली. केंद्र शासनाचा 90 टक्के आणि राज्याचा 10 टक्के हिस्सा या एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात आहे. जिल्ह्यात 269 गावात पाणलोटाची कामे मंजूर झाली आहेत.गावांत दिंडीचे आयोजन, पाणलोटाविषयी जनजागृती, निबंध स्पर्धा अशा माध्यमातून 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेडसिंगा येथील गावक-यांनी दिलेल्या सहभागाबद्दलही त्यांनी आभार मानले.
मेडसिंगा (ता. उस्मानाबाद) येथे डॅा. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जनजागृती अभियानाचा शुभारंभ डॅा. पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॅा. सुभाष व्हट्टे होते. जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रभारी जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सरपंच रघुराम आगळे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
तत्पूर्वी, डॅा. पाटील यांच्या हस्ते जीवन आगळे यांच्या शेतात नाला बंडिगच्या कार्यक्रमाने या अभियानास सुरुवात करण्यात आली. डॅा. पाटील म्हणाले की, पाणी हे जपून वापरले पाहिजे. मेडसिंगा येथे एकात्मिक कार्यक्रमातून 4 कोटी 57 लाख रुपयांची विविध कामे सुरु आहेत. लोकसहभाग हा महत्वाचा घटक असून प्रत्येक गावांनी अशाप्रकारे विकास योजनात लोकसहभाग नोंदविल्यास गावे स्वयंपूर्ण होतील.
डॅा. व्हट्टे यांनी पिण्याच्या पाण्याबाबत प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाले पाहिजे. पाणीवापराबाबत जागरुकता येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात तोटावार यांनी, या जनजागृती अभियानाबद्दल माहिती दिली. केंद्र शासनाचा 90 टक्के आणि राज्याचा 10 टक्के हिस्सा या एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात आहे. जिल्ह्यात 269 गावात पाणलोटाची कामे मंजूर झाली आहेत.गावांत दिंडीचे आयोजन, पाणलोटाविषयी जनजागृती, निबंध स्पर्धा अशा माध्यमातून 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेडसिंगा येथील गावक-यांनी दिलेल्या सहभागाबद्दलही त्यांनी आभार मानले.