बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सौंदरे (ता. बार्शी) येथील हॉटेल राजगड येथे जिल्हाप्रमुख लक्ष्‍मीकांत ठोंगेपाटील यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली बार्शी तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला.  आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी, बुथ प्रमुखांच्या कमिटीतील सदस्यांच्या अडचणी समजावून घेणे, शाखा प्रङ्कुखांना मार्गदर्शन करणे इत्यादीसाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
    यावेळी जिल्हा उपप्रमुख तात्‍यासाहेब भँवर, नेते भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे, तालुकाप्रमुख काका गायकवाड, शहरप्रमुख दिपक आंधळकर, बाबासाहेब कापसे, तालुका महिला संघटक सौ. मंगलताई पाटील, माजी नगरसेवक नागजी नान्नजकर, दिगंबर कानगुडे, रमेश चव्हाण, पप्पू पाटील, डॉ. जयगुरु स्वामी, सौ. मनीषा नान्नजकर आदिजण यावेळी उपस्थित होते.
    या मेळाव्यात तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने विविध मागण्यांचे निवेदन तयार करुन बार्शी तालुक्यातील उपस्थित शिवसैनिकांनी ठराव केले. यामध्ये राजेंद्र मिरगणे यांना धाराशिव मतदार संघातून लोकसभेसाठी तर भाऊसाहेब आंधळकर यांना विधानसभेसाठी शिवसेनेचे तिकीट मिळाल्यास आमचा विरोध नाही. बाहेरच्या उमेदवारास तिकीट देऊ नये. राजेंद्र राऊत यांना पक्षात प्रवेश देऊ नये आदी मागण्या असलेले लेखी पत्र तयार करण्यात आले आहे.
    सदरच्या मागणीचे लेखी पत्र तयार करुन प्रत्येक गावातील शिवसैनिकांच्या स्वाक्षर्‍या घेतलेले पत्र घऊन शिवसैनिकांसह मुंबईला जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याचे शिवसैनिकांच्या मेळाव्यात भाऊसाहेब आंधळकर यांनी म्हटले.
 
Top