उस्‍मानाबाद -: ज्‍येष्‍ठ नागरीकांनी मरणोत्‍तर देहदान व नेत्रदानाचा संकल्‍प करावा, असे आवाहन समर्थ नगर, उस्‍मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते नागरीक अशोक कुलकर्णी यांनी येथे केले.
    ब्राह्मण जोडो अभियानांतर्गत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्‍यक्ष गोविंदराव कुलकर्णी व उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष धनंजय पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली उस्‍मानाबाद ब्राह्मण समाजाचा मेळावा राममंदिर समर्थ नगर येथे घेण्‍यात आला. या मेळाव्‍यात अशोक कुलकर्णी बेंबळीकर यांनी केलेल्‍या देहदान व नेत्रदार संकल्‍पाबद्दल त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. या सत्‍काराला उत्‍तर देताना अशोक कुलकर्णी हे बोलत होते.
    या कार्यक्रमास ज्‍येष्‍ठ विधिज्ञ अरुण देशपांडे, काठीकर महाराज, डॉ. चंद्रशेखर डबीर यांच्‍यासह शहरातील व ब्राह्मण समाजातील कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.
 
Top