बार्शी : गौडगांव (ता. बार्शी) येथील लोकप्रतिष्ठा विचार मंचच्या वतीने बालदिनानिमित्त भटक्या समाजातील बालकांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले.
    रस्त्याच्या कडेला पालांत राहून जीवन जगत असलेल्या घिसाडी, पाथरवट जमातीतील बालकांना बालदिनाचे औचित्य साधून कपडे व खाऊ वाटप करण्यात आले, त्या बालकांच्या मातांनाही साडी वाटप करण्यात आल्याचे राहूल भड यांनी सांगीतले. यावेळी राहुल भड, नागनाथ काजळे, भास्कर काकडे, विनोद काजळे, दिपक कांबळे आदी उपस्थित होते.
(मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top