उस्मानाबाद :-  शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मुलींचे सामुहिक विवाहाकरिता अर्थसहाय्य शुभमंगल सामुहिक योजना, ही योजना 7 मे 2008 पासून कार्यान्वीत झाली आहे.
         शासननिर्णय 30 सप्टेंबर 2011 नुसार या योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.सन 2013-2014 या वर्षात जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मिळालेल्या तरतूदीतून सावरगाव ता.तुळजापूर या ग्रामपंचायतने  आयोजित केलेल्या विवाह सोहळयातील वधू पद्मिनी कालीदास साळुंके यांच्या मातोश्री श्रीमती सुगलाबाई  कालीदास साळुंके यांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैभव सुर्यवंशी यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री.कोळगे प.अ.शिंदे,पाटील, सं.अ. भोसले व विधी सल्लागार श्री.मनाळे इत्यादी उपस्थित होते.
 
Top