उस्मानाबाद :- राज्य महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाने एप्रिल ते आक्टोबर, 2013 या कालावधीत विविध मार्गावर तपासणी पथकाच्या माध्यमातून विना तिकीट प्रवास करणाऱ्या 130 प्रवाशांकडून प्रवासभाडे व दंडवसुली केली. प्रवासभाड्यापोटीची 9 हजार 73 रुपये तर दंडापोटी 12 हजार 70 रुपयांची वसुली करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक प्रदीप खोबरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  खोबरे यांच्यासह विभागीय वाहतूकअधिकारी एस. ए. हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत पाटील, ए.सी. गायकवाड, आर.आर. जगताप, पी.एम. पाटील, या मार्ग तपासणी प्रमुखांनी वरील कालावधीत या दंडाची वसुली केली. 
 
Top