उस्मानाबाद -: उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत परिचर या पदांसाठी दिनांक २६ आक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील प्राप्त गुणांनुसार कागदपत्र तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना 11 नोव्हेंबर रोजी मूळ कागदपत्रांसह बोलाविण्यात आले होते. या दिवशी जे उमेदवार गैरहजर होते त्यांनी १६ नोव्हेंबर रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत आपले मूळ कागदपत्र पडताळणीकरीता सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे सादर करावेत, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जि.प. उस्मानाबाद यांनी केले आहे. संबंधित दिवशी मूळ कागदपत्र सादर करणार नाहीत, अशा उमेदवारांना कोणतीही मुदतवाढ यापुढे मिळणार नसल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.