उस्मानाबाद :-  जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातंर्गत राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियान व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता तज्ज्ञ-1, शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार- 1, सनियंत्रण व मुल्यमापन तज्ज्ञ-1, लेखाधिकारी- 1, माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ 1, वित्त-नि- संपादणुक अधिकारी- 1,गट समन्वयक 4, समुह समन्वयक- 7 व शिपाई -1 याप्रमाणे पदभरती करणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी 29 नोव्हेंबरपर्यंत आपले अर्ज सदस्य सचिव, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, निर्मल भारत अभियान कक्ष, खोली क्र. 119, पहिला मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा समन्वयक तथा पशुसंवर्धन अधिकारी , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे. या पदभरतीबाबतची माहिती osmanabad.nic.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.   
 
Top