नळदुर्ग :- सर्वसामान्यांचा विकास करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येयधोरण आहे. त्यानुसारच राज्यशासनाकडून विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. या योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूर तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी दिले.
    धुरगुडे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त तुळजापूर तालुक्‍यातील चिवरी येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना त्यांनी चिवरी हे गाव तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून लाखो भाविकांच्या संपर्कातले गाव आहे. मात्र, या क्षेत्राचा, गावाचा अपेक्षित विकास झाला नाही. याकडे जातीने लक्ष देऊन विविध योजनांद्वारे येथे विकासकामे करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दीपक आलुरे, तालुका उपाध्यक्ष अरविंद आलुरे, कार्याध्यक्ष वसंत वडगावे, मजूर फेडरेशनचे नारायण नन्नवरे, शाम गायकवाड, सुशांत आलुरे, अशोक मुकरे यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दयानंद काळुंके यांनी तर संजय सूर्यवंशी यांनी आभार मानले. याप्रसंगी शिवाजी झिंगरे यांच्या मुलीच्या लग्नासाठी साहित्य देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वास बिराजदार, भगवान जाधव, बाळासाहेब देडे, अशोक मोरे, बालाजी होगाडे, अप्पाराव झिंगरे, राजेंद्र मुळे, सोमनाथ काळजाते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
 
Top