बार्शी : येथील इंडियन रेडक्रॉस संचलित सौ.प्रभावती सुरेशचंद्र कुंकूलोळ शिशु विकास केंद्राच्या वतीने दि. १४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्‍त सुभाष नगर येथे बाल आनंद मेळावा (धमाल जत्रा महोत्सव) चे मोफत आयोजन करण्यात आल्‍याची माहिती शिशु विकास केंद्राचे अध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी दिली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर रोजी बार्शी शहर परिसरातील बालकांना मन मोकळेपणाने विविध उपक्रमाद्वारे जल्लोसषात साजरा करता यावा, या उद्देशाने बार्शीसारख्या तालुक्या पातळीवर ग्रामीण भागात किंबहुना सोलापूर जिल्हात प्रथमच अशा प्रकारच्या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन होत आहे.
    बार्शी शहरातील सुभाषनगर उपनगरातील पोष्ट ऑफिस जवळील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सौ.प्रभावती सुरेशचंद्र कुंकूलोळ शिशु विकास केंद्रामध्ये गुरुवार दि. १४ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार्‍या या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मानद सचिव डॉ.काका सामनगावकर यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत पहिल्या सत्रात सुदृढ बालक स्पर्धा होणार असून ही स्पर्धा १ वर्ष ते ३ वर्ष व ३ वर्ष ते ५ वर्ष अशा दोन गटात होणार आहे. दोन्ही गटातील अनुक्रमे प्रथम तीन विजेतांना पारितोषके देण्यात येणार असून सहभागी प्रत्येक बालकाला एक भेट वस्तू देण्यात येणार आहे. सांयकाळी ५ ते ६ या दुपारच्या सत्रात जादूचे प्रयोगाने बालकांचे निखळ मनोरंजन होणार असून सांयकाळी ६ नंतरच्या शेवटच्या सत्रात टांगा, रेल्वे चक्कर, जंम्पींग जॅक (गादी घर), घोडा, उंट, सफर आदिसह विविध खेळ खेळणीचा आनंद बालकांना मोफत मिळणार आहे.     
     या दिवसभराच्या धमाल जत्रा महोत्सवात कला गुणदर्शन, विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शी शहरातील बालरोग तज्ञ हे सदृढ बालक स्पर्धचे परिक्षम म्हणून काम पाहणार आहेत. सुदृढ बालक स्पर्धेसह व इतर स्पर्धचे पारितोषिक वितरण ही तात्काळ त्याच ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
    शहर परिसरातील ३ ते १० वर्ष वयोगटाच्या बालकांसाठी या बाल आनंद मेळावा (धमाल जत्रा महोत्सव) चे मोफत आयोजन करण्यात आले असून अधिक माहिती साठी प्रशांत घोडके (९४२२३६७३४४) व प्रशांत बुडूख (९०११०९५६५९) यांच्याशी संपर्क करावा असेही कूंकूलोळ यांनी सांगितले. भविष्यात या ठिकाणी शिशु विकास चर्चा सत्रे, परिसंवाद मनोरंजन खेळ, बालविकास वर्ग, संस्कार, आरोग्य शिबीरे बाल आरोग्य शिक्षण व संगोपन क्षेत्रातील तज्ञ वक्तयांचे व्याखाने आदिचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शेवटी सांगितले. बाल आनंद मेळावा (धमाल जत्रा महोत्सव) यशस्वीतेसाठी शिशु विकास केंद्राचे मानद सचिव डॉ.बाळासाहेब देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे सर्व पदाधिकारी सदस्य विशेष परिश्रम घेत असून शहर परिसरातील पालकांनी आपल्या बालकांसाठी या मेळाव्यात मोठ्या संखेने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी कुंकूलोळ यांनी केले.
(मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top