पांगरी (गणेश गोडसे) -: गत अनेक वर्षांपासुन द्राक्ष उत्पादन घेऊन त्यात अर्थाजनाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणा-या व वीस वर्षांपासुन बाजारपेठेत जुनाच द्राक्षांचा दर घेऊन बागांचे जतन करण्याचा प्रयत्न करणा-या शेतक-यांच्या द्राक्षबागा त्यावर वर्षभर होणारा खर्च मिळणारे ऊत्पन्न व राहणारी शिल्लक याबाबत द्राक्ष उत्पादकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत. त्यांनी व्यक्त केलेली मत मतांतरे प्रशासनाला खरोखरच विचार करायला लावणारी अशीच आहेत. निसर्गाने फटकारल्यामुळे याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे.
 |
विजय गरड |
विजय गरड ( माजी सभापती व अध्यक्ष फार्मर्स क्लब पांगरी ) -: वीस वर्षांपुर्वी द्राक्षांना मिळणारा दर आजही जैसै थे अवस्थेत असुन द्राक्ष ऊत्पादनात व खर्चात मोठी भरीव वाढ झाली असली तरी ऊत्पादकांना मात्र अपेक्षित ऊत्पन्न मिळु शकत नसल्यामुळे द्राक्ष ऊत्पादकांमधुन नाराजी व्यक्त केली जात असुन दरवाढ होणे गरजेचे आहे.
 |
सतीश जाधव |
सतिश जाधव (माजी सरपंच पांगरी) -: द्राक्ष ऊत्पादकांचे भोग संपत नसुन सलग दुष्काळ, कधी अतिवृष्ठी यासह विविध प्रकारच्या रोगराईला बागा बळी पडुन द्राक्ष ऊत्पादकांचे खुप मोठे नुकसान होते. शेतक-यांची एकदा बाग फेल गेली तर तीन वर्षे त्याला झालेल्या एक वर्षांच्या नुकसानीतुन बाहेर पडायला लागतात.
 |
नानाप्पा मुंढे |
नानाआप्पा मुंढे (द्राक्ष ऊत्पादक, उक्कडगांव) -: आधीच कर्जबाजारी असलेल्या व कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या द्राक्ष ऊत्पादक शेतक-यांचे अनेक वर्षांपासुन हाल सुरू असुन वर्षभर बागा जिवापाड सांभाळुनही शेवटी तो विकण्यासाठी मात्र व्यापा-यांचीही मनधरणी करावी लागते. बागांच्या सुरूवातीपासुन शेवटापर्यंत शेतक-यांना अनंत यातनांचा सामना करावा लागतो.
 |
किरण मुळे |
किरण मुळे (द्राक्ष ऊत्पादक उक्कडगांव) :- दिवसेंदिवस द्राक्ष ऊत्पादक शेतक-यांचे भोग वाढतच आहेत. त्यांच्या वाटयाला प्रत्येक वर्षी फक्त अपयश आणि अपयशच येत आहे. निसर्ग एका हाताने देतो तर दुस-या हाताने कोणत्या तरी संकटद्वारे काढुनही घेतो. असेच प्रत्येक वर्षी घडते. त्यामुळे द्राक्ष ऊत्पादक शेतकरी प्रगती करू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे. नशिबाला दोष देत ऊत्पादक कपाळी हात मारून पुन्हा नव्या जोमाने लढण्यास तयार होतो. मात्र ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच त्याच्या नशिबी पुन्हा तेच येते.
 |
धनंजय शिंदे |
धनंजय शिंदे (द्राक्ष ऊत्पादक, चिंचोली) -: सलग पडलेल्या भिषण दुष्काळामुळे गत उन्हाळयात निर्माण झालेल्या पाण्याच्या बिकट परिस्थतीमुळे तेव्हा द्राक्षांच्या झांडांना जबरदस्त धक्के शॉक बसल्यामुळे व ऐन फळधारनेच्या काळात पाण्याची कमतरता जाणवल्यामुळे घडांची निर्मिती होऊ शकली नाही. या भागातील 80 टक्केच्या आसपास बागांना माल मिळु शकणार नाही. शेतक-यांची पिकेही आंधळी असल्यामुळे विभागवार माती परिक्षण केंद्रांची निर्मिती होणे गरजेचे आहे.
 |
मोहन घावटे |
मोहन घावटे (द्राक्ष ऊत्पादक, पांढरी) -: सहा महिने बागा जोपासुन व खर्च करूनही यावर्षी ऊत्पादकांच्या हाती कांहीच पडणार नसल्यामुळे शासनाने चालु वर्षी बागा जोपासण्यासाठी सर्वोत्तोपरी मदत करून शेतक-यांना अर्थसहाय्य उपलब्ध करूण द्यावे. तरच ऊत्पादक शेतकरी वर्षभर बागा सांभाळुन पुढच्या वर्षीसाठी तयार राहील.
 |
रामलिंग सुरवसे |
रामलिंग सुरवसे (द्राक्ष ऊत्पादक व मार्गदर्शक झानपुर) -: आडातच नाही तर पोह-यात कोठुन येणार ही म्हण यावर्षी शेतक-यासंदर्भात हुबेहुब ठरू पहात आहे. गतवर्षी विहीरी, बोअर आदीनी धोका दिल्यामुळे ऊन्हाळयात बागांना पाणी मिळु शकले नाही. त्याचा परिणाम आता मोठया प्रमाणात जाणवू लागलेला आहे. मोठया प्रमाणात बागांना घड निर्मिती होऊ शकली नाही. शेतक-यांमधुन निराशा जाणवू लागली आहे.
 |
शाम शिकेतोड |
शाम शिकेतोड (द्राक्ष ऊत्पादक पांढरी) -: अति ऊष्णतामानामुळे व बागा छाटल्यानंतर पाण्याअभावामुळे वलांडयाची वाढ होऊ शकली नाही. पहिल्या साठ दिवसात झाडांना सर्व घटक मुबलक प्रमाणात मिळणे गरजेचे असताना तसे होऊ शकले नाही. सुरूवातीला छाटनी केल्यानंतर पाण्याची कमतरता व नंतर लागुन राहीलेला पाऊस यामुळे द्राक्षांच्या फांदयांना मुळया सुटुन माल जिरला गेला. आमच्या तिन पिढया द्राक्ष बागा सांभाळत असल्या तरी निसर्गाच्या लहरीपणावर हे पिक अवलंबुन आहे.
 |
अतुल चालखोर |
अतुल चालखोर (द्राक्ष ऊत्पादक कारी) -: पाणी नसल्यामुळे शेतक-यांनी जुन मध्ये छाटन्या घेतल्या त्यामुळे काडी तयार होण्यास अपुरा कालावधी मिळाल्यामुळे काडी परिपक्व होऊ शकली नाही. परिणामी कारी गावात असलेल्या शंभर एकराच्या पुढील क्षेत्रापैकी फक्त पंचेविस टक्के बागांनाच माल दिसु लागला आहे. बाकी 75 टक्के बागा फेल गेल्या आहेत.