उस्मानाबाद :- संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी विविध ठिकाणी  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी उपस्थितांनीही उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. भारतीय राज्यघटनेप्रती आदर व्यक्त करत सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास तसेच श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य आणि दर्जा व संधीची समानता देणाऱ्या आपल्या संविधानाप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तहसीलदार सुभाष काकडे यांनी यावेळी संविधान उद्देशिकेबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
    यावेळी उपजिल्हाधिकारी के. ए. तडवी व शिल्पा करमरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार राजश्री मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
       यावेळी मुंबई येथे 26/11 च्या हल्ल्यात बळी पडलेल्या शहिदांनाही आदरांजली वाहून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विविध शाळांतील सुमारे 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
     जिल्हा पोलीस दलाच्या वतीनेही संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.  तसेच 26/11 तील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.
 
Top