ताज्या घडामोडी

नवी दिल्‍ली :- काँग्रेसचं भ्रष्ट राजकारण आणि राहुल गांधी यांच्यामुळे निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, अशी टीका रामदेव बाबा यांनी केली आहे. चुकीच्या धोरणांमुळे जनतेनं काँग्रेसला नाकारलं, असेही रामदेव बाबा म्हणाले.
    रामदेव बाबा यांनी आम आदमी पक्षालाही पाठिंबा दिला. भ्रष्टाचारामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असे रामदेव बाबांनी सांगताना आम आदमी पार्टीचं अभिनंदन केले. दिल्ली निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठी झेप मारत अनेक वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहणा-या काँग्रेसचा सफाया केला. विशेष म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव अरविंद केजरीवाल यांनी केला.
 
Top