कळंब (बालाजी जाधव) : कळंब-येरमाळा हा १५८ क्रमांकाचा राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लाक्ष्यामुळे अत्यंत खराब झालेला असून तो मृत्यूचा सापळाच बनलेला आहे.
विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रास मराठवाडा, कळंब येथून जाणारा रस्ता खूप वर्दळीचा आहे येथून मोठमोठे वाहने सतत जात असतात कळंब पासून येरमाळा पर्यंतचा या रस्त्याच्या साईड पट्या खचलेल्या आहेत तसेच दोन वाहने एकाच वेळेस जायचे झाल्यास त्यांचे एक एक चाक रस्त्याच्या खाली उतरते. सायंकाळी तर मोटार सायकल स्वारांना जीव मुठीत घेऊन आपले वहान चालवले लागत आहेत. अनेक वेळा प्रवासी व वाहनचालकांनी मागणी करून देखील हा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने नाग्रीकामधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे, आंदोरा व मस्सा खंडेश्वरी या गावाजवळ तर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहन धारकास कसरत करावी लागत आहे, गेल्या वर्षी पासून या मार्गावर अनेक अपघात झालेले आहेत त्या मध्ये काही मोटारसायकल स्वारास आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यामुळे तत्काळ या साईड पट्ट्या भरून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्रास मराठवाडा, कळंब येथून जाणारा रस्ता खूप वर्दळीचा आहे येथून मोठमोठे वाहने सतत जात असतात कळंब पासून येरमाळा पर्यंतचा या रस्त्याच्या साईड पट्या खचलेल्या आहेत तसेच दोन वाहने एकाच वेळेस जायचे झाल्यास त्यांचे एक एक चाक रस्त्याच्या खाली उतरते. सायंकाळी तर मोटार सायकल स्वारांना जीव मुठीत घेऊन आपले वहान चालवले लागत आहेत. अनेक वेळा प्रवासी व वाहनचालकांनी मागणी करून देखील हा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने नाग्रीकामधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे, आंदोरा व मस्सा खंडेश्वरी या गावाजवळ तर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहन धारकास कसरत करावी लागत आहे, गेल्या वर्षी पासून या मार्गावर अनेक अपघात झालेले आहेत त्या मध्ये काही मोटारसायकल स्वारास आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यामुळे तत्काळ या साईड पट्ट्या भरून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.