उस्मानाबाद :- राष्ट्रीय पिक विमा योजना रब्बी हंगाम 2012-2013 अंतर्गत वाशी तालुक्यातील ज्या शेतक-यांनी पिक विम्याचा हप्ता भरुन पिक संरक्षित केले होते, अशा शेतक-यांना पीक विम्याची नुकसान भरपाई विमा कंपनीने जाहीर केली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी कळविले आहे.
या पुर्वी फक्त वाशी या मंडळातील ३ हजार 424 शेतकऱ्यांना 94 लाख 2 हजार 321 रुपये इतका पिक विमा मंजूर झाल्याचे कळविण्यात आले होते. आता उर्वरीत दोन मंडळाची माहितीही विमा कंपनीकडुन प्राप्त झाली आहे. त्यानुसार तेरखेडा मंडळातील 5 हजार 155 शेतकऱ्यांना 1 कोटी,58 लाख,60 हजार 818 रुपये इतकी नुकसान भरपाई प्राप्त होणार आहे. तर पारगाव मंडळातील 4 हजार 384 शेतक-यांना 76 लाख, 83 हजार, 116 रुपये नुकसान भरपाई प्राप्त होणार आहे.