उस्मानाबाद :- ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ उस्मानाबाद येथे शनिवार, दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार असून जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सुभाष सासने यांनी कळविले आहे.
यावेळी ध्वजनिधी संकलन 2012 मध्ये उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालय/ यंत्रणेस बक्षिस/ प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच युध्द विधवा, वीरमाता, वीर पिता यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार व माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार/ शैक्षणिक शिष्यवृती व इतर कल्याणकारी योजनेचे आर्थिक मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, युध्द विधवा/ माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आणि मेजर (नि)सासने यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार असून जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सुभाष सासने यांनी कळविले आहे.
यावेळी ध्वजनिधी संकलन 2012 मध्ये उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालय/ यंत्रणेस बक्षिस/ प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच युध्द विधवा, वीरमाता, वीर पिता यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार व माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार/ शैक्षणिक शिष्यवृती व इतर कल्याणकारी योजनेचे आर्थिक मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, युध्द विधवा/ माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आणि मेजर (नि)सासने यांनी केले आहे.
