बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : ग्रामसभा घेण्याच्या कारणावरुन झालेल्या तक्रारींचा निर्णय देताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे बार्शी तालुक्यातील बावी (आ.) येथील ग्रामस्थांची मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आल्याची माहिती नागनाथ लोंढे यांनी दिली. संपूर्ण ग्रामसभेच्या बैठकीत किरकोळ तणावाचे वातावरण व शासकीय यंत्रणेची उपस्थिती, पोलिस बंदोबस्त व मोठ्या संख्येनी ग्रामस्थांची उपस्थिती यामुळे या ग्रामसभेला विशेष महत्व प्राप्त झाले होते.
या ग्रामसभेत ज्यांची तक्रार करण्यात आली त्यांनाच लोकांनी सर्वानुमते निवड करुन पाणलोट समिती गठीत करण्यात आली. मंगळवारी दि.३ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता झालेल्या या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी भूषविले. याप्रसंगी कृषी विभागाचे श्रीधर जोशी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी साठे, पांगरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद मेमाने आदीजण उपस्थित होते. यावेळी व्हिडिओ शुटींग कॅमेरे, फोटोग्राफर व यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. या ग्रामसभेसाठी सुमारे ६२५ लोकांची उपस्थिती होती.
हात वर करुन मतदान घेण्यात आले व लोकांनी सर्वानुमते निवड केली. गावावर होत असलेल्या अन्यायाला प्रतिकार तसेच गावातील विकासाला बाधा आणणार्या लोकांना धडा शिकविण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्रित आले असल्याचे लोंढे यांनी सांगीतले.
प्रास्ताविक उपसरपंच सुर्यकांत आगलावे यांनी केले. कृषी विभागाचे झोरे साहेब यांनी पाणलोट समिती गठीत करण्याबाबतचा जिल्हाधिकारी डॉ. गेडाम साहेब यांचा आदेश व शासन निर्णय वाचून दाखविला. जोशी यांनी पाणलोट समिती गठीत करण्यासंबंधीत लोकांना मार्गदर्शन केले
यावेळी सचिवपदी रामेश्वर बळीराम आगलावे तसेच इतर सदस्यांची निवड करण्यात आली. ग्रामसभा यशस्वीतेसाठी चंद्रकांत आगलावे, रवि लोंढे, लहु आगलावे, सुरेश सदाशिव आगलावे, कपिल कुलकर्णी, बाबासाहेब डोइफोडे, भालचंद्र आगलावे, सचिन लोंढे यांनी परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व सदस्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत, मेजर मच्छिंद्र फोपले यांनी अभिनंदन केले व गावकर्यांचे आभार मानले.
या ग्रामसभेत ज्यांची तक्रार करण्यात आली त्यांनाच लोकांनी सर्वानुमते निवड करुन पाणलोट समिती गठीत करण्यात आली. मंगळवारी दि.३ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता झालेल्या या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी भूषविले. याप्रसंगी कृषी विभागाचे श्रीधर जोशी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी साठे, पांगरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद मेमाने आदीजण उपस्थित होते. यावेळी व्हिडिओ शुटींग कॅमेरे, फोटोग्राफर व यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. या ग्रामसभेसाठी सुमारे ६२५ लोकांची उपस्थिती होती.
हात वर करुन मतदान घेण्यात आले व लोकांनी सर्वानुमते निवड केली. गावावर होत असलेल्या अन्यायाला प्रतिकार तसेच गावातील विकासाला बाधा आणणार्या लोकांना धडा शिकविण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्रित आले असल्याचे लोंढे यांनी सांगीतले.
प्रास्ताविक उपसरपंच सुर्यकांत आगलावे यांनी केले. कृषी विभागाचे झोरे साहेब यांनी पाणलोट समिती गठीत करण्याबाबतचा जिल्हाधिकारी डॉ. गेडाम साहेब यांचा आदेश व शासन निर्णय वाचून दाखविला. जोशी यांनी पाणलोट समिती गठीत करण्यासंबंधीत लोकांना मार्गदर्शन केले
यावेळी सचिवपदी रामेश्वर बळीराम आगलावे तसेच इतर सदस्यांची निवड करण्यात आली. ग्रामसभा यशस्वीतेसाठी चंद्रकांत आगलावे, रवि लोंढे, लहु आगलावे, सुरेश सदाशिव आगलावे, कपिल कुलकर्णी, बाबासाहेब डोइफोडे, भालचंद्र आगलावे, सचिन लोंढे यांनी परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व सदस्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत, मेजर मच्छिंद्र फोपले यांनी अभिनंदन केले व गावकर्यांचे आभार मानले.