कळंब (बालाजी जाधव) :- कळंब तहसिल कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेवरती असलेली निवड समिती रद्द करावी, अशी मागणी कळंब तालुक्यातील मस्सा (खं.) येथील जनार्धन रामचंद्र राऊत यांनी निवेदनाद्वारे उस्मानाबाद जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कळंब तहसिल कार्यालयात संगायो व श्रावणबाळ निराधार योजनेत योग्य लाभार्थ्यांची निवड न करता धनदांडग्याची व पुढा-यांची कामे वशिलाने केली जात असून योग्य लाभार्थ्यांची निवड केली जात नाही. तरी याप्रकरणी संबंधित अधिका-यांवरती योग्य ती कार्यवाही करावी, तसेच गाव स्तरावरुन पंचनामा करुन योग्य लाभार्थी यांची निवड करावी, तसेच सदरील समित्या रद्द करण्याची मागणी जनार्धन राऊत यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कळंब तहसिल कार्यालयात संगायो व श्रावणबाळ निराधार योजनेत योग्य लाभार्थ्यांची निवड न करता धनदांडग्याची व पुढा-यांची कामे वशिलाने केली जात असून योग्य लाभार्थ्यांची निवड केली जात नाही. तरी याप्रकरणी संबंधित अधिका-यांवरती योग्य ती कार्यवाही करावी, तसेच गाव स्तरावरुन पंचनामा करुन योग्य लाभार्थी यांची निवड करावी, तसेच सदरील समित्या रद्द करण्याची मागणी जनार्धन राऊत यांनी केली आहे.