सोलापूर :- संत साहित्याचा नंदादीप प्रत्येकाच्या मनात अखंड तेवत आहे म्हणूनच संत साहित्य कालबाह्य होणे शक्य नाही असे, प्रतिपादन पद्मश्री डॉ.यु.म.पठाण यांनी केले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सव-2014 च्या दुस-या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सत्रातील संत साहित्यावरील परिसंवाद या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संत साहित्याने आपल्याला काय दिले ? या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत साहित्याचे अभ्यासक तथा भागवताचार्य वा.ना. उत्पात, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी, साहित्यिक प्रा. डॉ. सुहास पुजारी आणि जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. पठाण म्हणाले की, संत साहित्याला संदर्भ मुल्य आहे त्यामूळे संत साहित्य कालातीत आहे. मानवाच्या मनाला उन्नतता आणण्याचे काम संत साहित्य करते म्हणून त्याला महत्व आहे. संत साहित्याची संस्कृती वारशाची आज नव्या पिढीला गरज आहे कारण आज जग बदलले आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक उन्नयनात थोर संतांचे 12 वे आणि 13 वे शतक अत्यंत महत्वाचे आहे. या संतांनी आपल्या संत साहित्यातून उदात्त जीवनमुल्ये, पावित्र्याचा विचार आणि चांगले जीवन जगण्याची दृष्टी दिली. कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास म्हणजे संत साहित्य किंवा अध्यात्म होय. चंगळवादामुळे जीवन कसं जगावं याचा विचार करण्याची आज नितांत गरज आहे. मनुष्याने चित्त समाधानी ठेवले आणि प्रत्येकाचा धर्म समजुन घेतला तर समाजात वावरणे सोपे जाईल. यामुळेच व्यक्तिमत्वाची जडणघडण करताना संत साहित्याच्या पावित्र्याचे संस्कार केले तेव्हाच आपण स्वत: सुधारणार, पर्यायाने समाज सुधारेल, देश सुधारेल आणि आपण विश्वात्मकतेच्या पातळीवर जाऊन पोहोचु असे झाले तर निश्चितच भारत तिसरी जागतिक सत्ता होईल असा उल्लेखही त्यांनी केला.
वा.ना. उत्पात संत साहित्य आणि समाज प्रबोधन या विषयावर बोलताना म्हणाले की, संतांनी समाजप्रबोधन करताना जिथे दोष आहे तिथे शाब्दीक औषधाने तो नीट केला, समाजाला जागे करणे म्हणजेच प्रबोधन होय. ज्या साहित्याने समाजकल्याण साधले जाते, त्यालाच साहित्य म्हणतात. संत साहित्याने हे काम अत्यंत चोखपणे बजावले आहे. ज्ञानोबारायांनी आध्यात्मिक समतेचा धडा दिला आणि सर्वांना ज्ञानाचा अधिकार आहे सुमारे 800 वर्षापूर्वी विशद केले. प्राचीन भारतीय परंपरेत जातीय समानता होती आज संधीची समानता आहे. लोकांचे अंत:करण राखावे हीच समता अशी संतांची शिकवण होती. ईश्वराच्या पुजेचे मर्म म्हणजे कोणालाही दुखवु नये असा आहे त्यामुळे प्रत्येकाने लौकिकार्थाने राष्ट्राची सेवा हेच खरे भजन असे मानले पाहिजे असेही ते म्हणाले.
डॉ. स्वामी संत साहित्य आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर बोलताना म्हणाले की, संतांनी माणसाच्या देवत्वाला जागे करण्याचे काम त्यांच्या काळात, त्यांच्या पध्दतीने आणि त्यांच्या वाणीने केले. गौतम बुध्द, सिध्दरामेश्वर, बसवेश्वर, ज्ञानेश्वर, कबीर हे संत साहित्याच्या आकाशातले नक्षत्र आहेत. या नक्षत्रांचा आपण अभ्यास केला तर निश्चितच आपले आयुष्य उजळुन निघेल. मानव हा मुळात एकच आहे याची सहानुभुती संतांच्या रचनांमधून पहायला मिळते. दुस-यांचे कल्याण करणे हाच धर्म असल्याचे संतांनी शिकविले आहे. त्यामूळे सगळ्या धर्माचा पाया हा मानवासाठी असणारी करुणा व दया असल्याचे ते म्हणाले.
डॉ. पुजारी संत साहित्य प्रपंच आणि परमार्थ याविषयी बोलताना म्हणाले की, प्रपंच आणि परमार्थ मानवी पक्षाचे दोन पंख आहेत. याकडे समान दृष्टीने पाहता यायला पाहिजे. प्रपंचात राहून विहित कार्य निष्टेने करणे म्हणजेच स्वधर्म होय. पंचेंद्रीयाच्या पुढे असलेले ज्ञान म्हणजेच परमार्थ आणि परमार्थ म्हणजे आत्मज्ञान होय. मानवाने सर्व जबाबदा-या सांभाळून परमार्थ करावा असे संतांनी म्हणटले आहे. भक्तीची वाट अनुसरताना केवळ देवाचा नव्हे तर मानवतेचा भक्त झाले पाहिजे असे संतांनी संत साहित्यातून शिकविले आहे. प्रत्येकाने जीवनमुल्ये जसे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सांभाळून परमार्थ केला पाहिजे.
परिसंवादाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांनी तर सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास संतसाहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी आणि प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सव-2014 च्या दुस-या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सत्रातील संत साहित्यावरील परिसंवाद या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संत साहित्याने आपल्याला काय दिले ? या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत साहित्याचे अभ्यासक तथा भागवताचार्य वा.ना. उत्पात, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी, साहित्यिक प्रा. डॉ. सुहास पुजारी आणि जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. पठाण म्हणाले की, संत साहित्याला संदर्भ मुल्य आहे त्यामूळे संत साहित्य कालातीत आहे. मानवाच्या मनाला उन्नतता आणण्याचे काम संत साहित्य करते म्हणून त्याला महत्व आहे. संत साहित्याची संस्कृती वारशाची आज नव्या पिढीला गरज आहे कारण आज जग बदलले आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक उन्नयनात थोर संतांचे 12 वे आणि 13 वे शतक अत्यंत महत्वाचे आहे. या संतांनी आपल्या संत साहित्यातून उदात्त जीवनमुल्ये, पावित्र्याचा विचार आणि चांगले जीवन जगण्याची दृष्टी दिली. कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास म्हणजे संत साहित्य किंवा अध्यात्म होय. चंगळवादामुळे जीवन कसं जगावं याचा विचार करण्याची आज नितांत गरज आहे. मनुष्याने चित्त समाधानी ठेवले आणि प्रत्येकाचा धर्म समजुन घेतला तर समाजात वावरणे सोपे जाईल. यामुळेच व्यक्तिमत्वाची जडणघडण करताना संत साहित्याच्या पावित्र्याचे संस्कार केले तेव्हाच आपण स्वत: सुधारणार, पर्यायाने समाज सुधारेल, देश सुधारेल आणि आपण विश्वात्मकतेच्या पातळीवर जाऊन पोहोचु असे झाले तर निश्चितच भारत तिसरी जागतिक सत्ता होईल असा उल्लेखही त्यांनी केला.
वा.ना. उत्पात संत साहित्य आणि समाज प्रबोधन या विषयावर बोलताना म्हणाले की, संतांनी समाजप्रबोधन करताना जिथे दोष आहे तिथे शाब्दीक औषधाने तो नीट केला, समाजाला जागे करणे म्हणजेच प्रबोधन होय. ज्या साहित्याने समाजकल्याण साधले जाते, त्यालाच साहित्य म्हणतात. संत साहित्याने हे काम अत्यंत चोखपणे बजावले आहे. ज्ञानोबारायांनी आध्यात्मिक समतेचा धडा दिला आणि सर्वांना ज्ञानाचा अधिकार आहे सुमारे 800 वर्षापूर्वी विशद केले. प्राचीन भारतीय परंपरेत जातीय समानता होती आज संधीची समानता आहे. लोकांचे अंत:करण राखावे हीच समता अशी संतांची शिकवण होती. ईश्वराच्या पुजेचे मर्म म्हणजे कोणालाही दुखवु नये असा आहे त्यामुळे प्रत्येकाने लौकिकार्थाने राष्ट्राची सेवा हेच खरे भजन असे मानले पाहिजे असेही ते म्हणाले.
डॉ. स्वामी संत साहित्य आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर बोलताना म्हणाले की, संतांनी माणसाच्या देवत्वाला जागे करण्याचे काम त्यांच्या काळात, त्यांच्या पध्दतीने आणि त्यांच्या वाणीने केले. गौतम बुध्द, सिध्दरामेश्वर, बसवेश्वर, ज्ञानेश्वर, कबीर हे संत साहित्याच्या आकाशातले नक्षत्र आहेत. या नक्षत्रांचा आपण अभ्यास केला तर निश्चितच आपले आयुष्य उजळुन निघेल. मानव हा मुळात एकच आहे याची सहानुभुती संतांच्या रचनांमधून पहायला मिळते. दुस-यांचे कल्याण करणे हाच धर्म असल्याचे संतांनी शिकविले आहे. त्यामूळे सगळ्या धर्माचा पाया हा मानवासाठी असणारी करुणा व दया असल्याचे ते म्हणाले.
डॉ. पुजारी संत साहित्य प्रपंच आणि परमार्थ याविषयी बोलताना म्हणाले की, प्रपंच आणि परमार्थ मानवी पक्षाचे दोन पंख आहेत. याकडे समान दृष्टीने पाहता यायला पाहिजे. प्रपंचात राहून विहित कार्य निष्टेने करणे म्हणजेच स्वधर्म होय. पंचेंद्रीयाच्या पुढे असलेले ज्ञान म्हणजेच परमार्थ आणि परमार्थ म्हणजे आत्मज्ञान होय. मानवाने सर्व जबाबदा-या सांभाळून परमार्थ करावा असे संतांनी म्हणटले आहे. भक्तीची वाट अनुसरताना केवळ देवाचा नव्हे तर मानवतेचा भक्त झाले पाहिजे असे संतांनी संत साहित्यातून शिकविले आहे. प्रत्येकाने जीवनमुल्ये जसे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सांभाळून परमार्थ केला पाहिजे.
परिसंवादाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांनी तर सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास संतसाहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी आणि प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.