25 जानेवारी रोजी ' राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा होत आहे. केवळ या दिवसाचे स्मरण करणे एवढ्या पुरता हा दिवस नाही. तर लोकशाही सदृढ, सक्षम व देशाच्या विविधांगी विकासाला गती, चालना देण्यासाठीचा हा दिवस आहे. देशाचा एक जागृत, देशप्रेमी नागरीक म्हणून प्रत्येकाने मतदान करणे, मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे एका प्रकारे, राष्ट्रीय कर्तव्य बजावणे होय.
देशाच्या विकासासाठी वैचारिक कृती आवश्यक आहे. त्या राष्ट्राचा विकासाचा पाया वैचारिक विधायक कृतीतून मजबूत होतो असे म्हणतात. हा विचार मनात घेवून प्रत्येकाने राष्ट्राच्या संवर्धनासाठी, मजबूतीसाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. मला काय त्याचे? हे माझ्यासाठी नाही? अशा सारखी वृत्ती घातक ठरु शकते.
मी एकटयाने मतदान केले नाही तर असा काय मोठा फरक पडणार आहे! आज किंवा मतदाना निमित्त राष्ट्रीय सुट्टी आहे. तर ती कुटुंबीयासोबत पर्यटन स्थळी साजरी करु, असा विचार म्हणजे स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्यप्रती बद्दल दाखविलेला अनादर होय. भारतीय निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस ' राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. देशाचे माजी पंतप्रधान कै.राजीव गांधी यांच्या विशेष आग्रहाने आणि प्रयत्नाने युवक- युवतींचा मतदानाचा हक्क 21 वर्षापासून 18 वर्षापर्यंत आणण्यात आला. त्यामध्ये हाच उद्देश होता की, युवक-युवतींनी राष्ट्राबद्दल-देशाबद्दल जागरुक राहुन एक सशक्त, सक्षम असे सरकार निवडावे. जेणे करुन, देशाच्या लोकशाहीला आणखीन बळ मिळेल.
नुकत्याच पाच राज्यात झालेल्या निवडणुकामध्ये सर्वाधिक प्रभाव टाकला तो युवा पिढीने....कधी नव्हे ती, मतदानाच्या टक्केवारीत अविश्वसनीय अशी वाढ झाली. मध्यप्रदेश 70 टक्के, छत्तीसगड 73.50 टक्के, राजस्थान 74.30 टक्के, दिल्ली 70 टक्के तर सर्वाधिक मतदान झाले ते ईशान्य कडील मिझोराम राज्यात या राज्यात तब्बल 81 टक्के इतके विक्रमी मतदान झाले.यामध्ये सर्वाधिक उत्साहवर्धक बाब म्हणजे, मतदान करण्याबद्दल तसेच सक्षम सरकार निवडून आणण्याबद्दल युवा पिढी जागृत होत आहे. ज्या देशात युवा पिढी जागृत व सक्षम आहे. त्या देशाच्या सर्वागींण उन्नतीबाबत कोणाच्याही मनात शंका नको.....
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूकीसाठी कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचारी वर्गाला मतदान करण्याचा किंवा संबंधितांना मतदानाचा हक्क बजावता यावा. त्यांना या प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे.असे निर्देश दिले आहे.यानुसार निवडणूक प्रक्रियेत कार्यरत राहणा-या सर्वांना टपाल मतपत्रिका, निवडणूक कार्य प्रमाणपत्र आदींच्या मदतीने सर्व अधिका-यांना व कर्मचा-यांना मतदान करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्याचा विचार करता 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारीत पुर्नरिक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात सुमारे 30 लाख 55 हजार 862 इतके मतदार आहेत. या मतदारांपैकी 29 लाख 5 हजार 83 इतक्या मतदारांना मतदान ओळखपत्र वितरीत करण्यात आली असून, याचे प्रमाण सुमारे 95.79 टक्के इतके आहे. उर्वरीत मतदारांच्या फोटोचेही काम लोकसभा निवडणूकीपुर्वी करण्यात येईल अशी माहिती निवडणूक उप-जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी दिली.
आगामी काळात लोकसभा तसेच विधान सभेच्या निवडणूका लागतील.तेव्हा लोकशाही मतदात्यांची एकजूट काय करु शकते.याची झलक तुम्ही दाखवाल नव्हे ती तुम्ही दाखवावीच.....या अपेक्षासह... तुम्ही मतदान कराच परंतु घरातील 18 वर्षापुढील सर्व व्यक्तींना शेजारी पाजा-यांना तसेच गावांतील सर्व सज्ञान व्यक्तींना मतदानासाठी प्रवृत्त करा....! आणि चार इंच छाती गर्वाने पुढे काढून अभिमानाने म्हणा....मेरा भारत महान! जय हिंद....जय भारत!
- फारुक बागवान,
उपमाहिती कार्यालय पंढरपूर.
देशाच्या विकासासाठी वैचारिक कृती आवश्यक आहे. त्या राष्ट्राचा विकासाचा पाया वैचारिक विधायक कृतीतून मजबूत होतो असे म्हणतात. हा विचार मनात घेवून प्रत्येकाने राष्ट्राच्या संवर्धनासाठी, मजबूतीसाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. मला काय त्याचे? हे माझ्यासाठी नाही? अशा सारखी वृत्ती घातक ठरु शकते.
मी एकटयाने मतदान केले नाही तर असा काय मोठा फरक पडणार आहे! आज किंवा मतदाना निमित्त राष्ट्रीय सुट्टी आहे. तर ती कुटुंबीयासोबत पर्यटन स्थळी साजरी करु, असा विचार म्हणजे स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्यप्रती बद्दल दाखविलेला अनादर होय. भारतीय निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस ' राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. देशाचे माजी पंतप्रधान कै.राजीव गांधी यांच्या विशेष आग्रहाने आणि प्रयत्नाने युवक- युवतींचा मतदानाचा हक्क 21 वर्षापासून 18 वर्षापर्यंत आणण्यात आला. त्यामध्ये हाच उद्देश होता की, युवक-युवतींनी राष्ट्राबद्दल-देशाबद्दल जागरुक राहुन एक सशक्त, सक्षम असे सरकार निवडावे. जेणे करुन, देशाच्या लोकशाहीला आणखीन बळ मिळेल.
नुकत्याच पाच राज्यात झालेल्या निवडणुकामध्ये सर्वाधिक प्रभाव टाकला तो युवा पिढीने....कधी नव्हे ती, मतदानाच्या टक्केवारीत अविश्वसनीय अशी वाढ झाली. मध्यप्रदेश 70 टक्के, छत्तीसगड 73.50 टक्के, राजस्थान 74.30 टक्के, दिल्ली 70 टक्के तर सर्वाधिक मतदान झाले ते ईशान्य कडील मिझोराम राज्यात या राज्यात तब्बल 81 टक्के इतके विक्रमी मतदान झाले.यामध्ये सर्वाधिक उत्साहवर्धक बाब म्हणजे, मतदान करण्याबद्दल तसेच सक्षम सरकार निवडून आणण्याबद्दल युवा पिढी जागृत होत आहे. ज्या देशात युवा पिढी जागृत व सक्षम आहे. त्या देशाच्या सर्वागींण उन्नतीबाबत कोणाच्याही मनात शंका नको.....
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूकीसाठी कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचारी वर्गाला मतदान करण्याचा किंवा संबंधितांना मतदानाचा हक्क बजावता यावा. त्यांना या प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे.असे निर्देश दिले आहे.यानुसार निवडणूक प्रक्रियेत कार्यरत राहणा-या सर्वांना टपाल मतपत्रिका, निवडणूक कार्य प्रमाणपत्र आदींच्या मदतीने सर्व अधिका-यांना व कर्मचा-यांना मतदान करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्याचा विचार करता 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारीत पुर्नरिक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात सुमारे 30 लाख 55 हजार 862 इतके मतदार आहेत. या मतदारांपैकी 29 लाख 5 हजार 83 इतक्या मतदारांना मतदान ओळखपत्र वितरीत करण्यात आली असून, याचे प्रमाण सुमारे 95.79 टक्के इतके आहे. उर्वरीत मतदारांच्या फोटोचेही काम लोकसभा निवडणूकीपुर्वी करण्यात येईल अशी माहिती निवडणूक उप-जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी दिली.
आगामी काळात लोकसभा तसेच विधान सभेच्या निवडणूका लागतील.तेव्हा लोकशाही मतदात्यांची एकजूट काय करु शकते.याची झलक तुम्ही दाखवाल नव्हे ती तुम्ही दाखवावीच.....या अपेक्षासह... तुम्ही मतदान कराच परंतु घरातील 18 वर्षापुढील सर्व व्यक्तींना शेजारी पाजा-यांना तसेच गावांतील सर्व सज्ञान व्यक्तींना मतदानासाठी प्रवृत्त करा....! आणि चार इंच छाती गर्वाने पुढे काढून अभिमानाने म्हणा....मेरा भारत महान! जय हिंद....जय भारत!
- फारुक बागवान,
उपमाहिती कार्यालय पंढरपूर.