उस्मानाबाद :- सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राज्य शासनाने विविध लोकोपयोगी योजना सुरु केल्या आहेत. सर्वांच्या सहकार्याने एकात्मिक विकास करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
उस्मानाबाद येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस संचलन मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा 64 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जिल्हा सरकारी वकील व्ही.बी. शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, विविध योजनांच्या माध्यमातून राज्य शासन विकास करीत आहे. ही विकासाची गती वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. सामान्य नागरिकांना गंभीर आजारांवर महागडे वैद्यकीय उपचार घेणे सुलभ व्हावे यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य़ योजना आपण सुरु केली आहे. त्याअंतर्गत शहरी भागातील लाभार्थींना आरोग्य पत्र टपाल कार्यालयातून वाटपाचा आज आपण शुभारंभ करत असल्याचे ते म्हणाले.
सर्वांना पुरेसे व चांगले अन्न मिळावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 लाख 77 हजार नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषद कार्यक्षेत्रात नागरिकांसाठी मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध आणि बळकटीकरण करुन देण्यासाठी भरीव निधी जिल्हा वार्षिक योजना आणि इतर योजनांमधून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याशिवाय, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत यावर्षी 243 लाख 47 हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला असून या कार्यक्रमात जिल्ह्यातील 203 नवीन गावे आणि वाड्यांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात आलेला आहे. आतापर्यंत ज्या गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या नाहीत, त्याठिकाणी नवीन योजना राबविण्यासाठी लोकवर्गणीची अट लागू राहणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
तात्पुरत्या उपायांबरोबरच दीर्घकालीन विकास आणि व्यापक जनहित समोर ठेवून राज्य शासन काम करीत आहे. कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्याला पाणी टंचाईमुक्त करणे, संतुलित औद्योगिक विकास, सुनियोजित नागरीकरण आणि शैक्षणिक दर्जात वाढ या पाच सूत्रांवर आधारित पुढील विकासाची वाटचाल करण्याचे आपल्या राज्य शासनाचे धोरण असल्याचे ते म्हणाले.
मुलींना स्व-विकासाची पूर्ण संधी मिळावी यासाठी सुकन्या योजना, पीडित, अन्यायग्रस्त महिला आणि बालकांना आर्थिक साहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनोधैर्य योजना राज्य शासनाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
जिल्ह्यात यावर्षी आपण स्वर्ण जयंती राजस्व अभियान अधिक व्यापक व विस्तारित स्वरुपात राबविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून चव्हाण यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही अनेक विकासकामे गावोगावी होत असल्याचे आवर्जून नमूद केले.
समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. रमाई आवास योजना, विमुक्त भटक्या समाजाकरिता विशेष प्रयत्न, व्यसनमुक्तीचे धोरण आपण तयार केले आहे. नुकताच राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायदा केला आहे. पुरोगामी राज्य अशी ओळख कायम ठेवणारा हा निर्णय असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य शासनाने अनेक चांगले निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. कामधेनू दत्तक ग्राम योजना, अंडी उबवण संयंत्राचे वाटप, दुधाळ जनावरांचे वाटप, मांसल कुक्कुट पक्षीपालन योजना, वैरण विकास कार्यक्रम, आधुनिक मत्स्यबाजारपेठ उभारणी अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. मराठवाड्यात दुध व्यवसायाला गती मिळावी यासाठी आपण न्यू जनरेशन को ऑपरेटीव्ह धर्तीवर संकलन व्यवस्था निर्माण करीत आहोत. त्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाशी नुकताच सामंजस्य करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सावकारांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी जुना सावकारी कायदा अपुरा पडतो. त्यामुळे प्रभावशाली व परिणामकारक नियमन करणारा नवा कायदा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ग्रामसभेत या कायद्यातील तरतूदींच्या वाचनामुळे या कायद्याविषयी जागृती होऊन सावकारापासून होणाऱ्या आर्थिक पिळवणूकीस प्रतिबंध होणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान, हरित महाराष्ट्र अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
या समारंभासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान ध्वजारोहणानंतर पोलीस उप अधीक्षक एम. राजकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शानदार संचलन केले. या संचलनात पोलीस पुरुष,महिला, होमगार्ड, पुरुष,महिला,एन सी सी ,पोलीस बॅन्ड पथक, वाहक नियंत्रणा शाखा, भोसले हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कुल, जिल्हा परिषद (कन्या) शाळा, भारत विद्यालयाचे एन. सी .सी. पथक, तेरणा पब्लीक हायस्कुल, शरद पवार हायस्कुल यांचे पथकही सहभागी झाले होते. याशिवाय पोलीस श्वानपथक, पोलीस व्रज वाहन, महिला छेडछाड विरोधी पथक, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, दंगल नियंत्रण पथक, पोलीस बॉम्बशोधक व नाशक पथक, आरोग्य, सामाजिक वनीकरण, निर्मल भारत अभियान, वन विभाग, सर्व शिक्षा अभियान, जिल्हा शासकीय रुगणालय, कृषि विभाग, महसूल विभाग,एस. टी. महामंडळ, अग्निशमन दलाच्या चित्ररथ पथकांनी यात सहभाग घेतला.
सुरुवातीला लिटल स्टार प्राथमिक शाळेचे लेझिम पथक व एकलव्य आश्रमशाळा यमगरवाडी यांच्या झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारत स्काऊड आणि गाईड यांनी चाचणी शिबीरात यशस्वी झाल्याबद्दल संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनींना पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करणत आले. नर्सिंग व मिडवायफरींग परिक्षेत महाराष्ट्रातून प्रथम व व्दितीय आलेल्या प्रियंका पोळे व रुपाली घोंगडे यांचा तर जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्काराबद्दल स्नेहल खामितकर, शाम जाधवर, आणि मोहन पाटील तसेच लुधियाना येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात लोकनृत्यात राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करणारा उस्मानाबादचा संघ सम्राट नाटय व सांस्कृकि मंडळाचे प्रमुख विशाल शिंगाडे व सहकाऱ्यांचाही पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पोलीस मुख्यालयाच्या आवारात पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत प्रांगणात अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उस्मानाबाद येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस संचलन मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा 64 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जिल्हा सरकारी वकील व्ही.बी. शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, विविध योजनांच्या माध्यमातून राज्य शासन विकास करीत आहे. ही विकासाची गती वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. सामान्य नागरिकांना गंभीर आजारांवर महागडे वैद्यकीय उपचार घेणे सुलभ व्हावे यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य़ योजना आपण सुरु केली आहे. त्याअंतर्गत शहरी भागातील लाभार्थींना आरोग्य पत्र टपाल कार्यालयातून वाटपाचा आज आपण शुभारंभ करत असल्याचे ते म्हणाले.
सर्वांना पुरेसे व चांगले अन्न मिळावे यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 लाख 77 हजार नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषद कार्यक्षेत्रात नागरिकांसाठी मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध आणि बळकटीकरण करुन देण्यासाठी भरीव निधी जिल्हा वार्षिक योजना आणि इतर योजनांमधून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याशिवाय, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत यावर्षी 243 लाख 47 हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला असून या कार्यक्रमात जिल्ह्यातील 203 नवीन गावे आणि वाड्यांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात आलेला आहे. आतापर्यंत ज्या गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या नाहीत, त्याठिकाणी नवीन योजना राबविण्यासाठी लोकवर्गणीची अट लागू राहणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
तात्पुरत्या उपायांबरोबरच दीर्घकालीन विकास आणि व्यापक जनहित समोर ठेवून राज्य शासन काम करीत आहे. कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्याला पाणी टंचाईमुक्त करणे, संतुलित औद्योगिक विकास, सुनियोजित नागरीकरण आणि शैक्षणिक दर्जात वाढ या पाच सूत्रांवर आधारित पुढील विकासाची वाटचाल करण्याचे आपल्या राज्य शासनाचे धोरण असल्याचे ते म्हणाले.
मुलींना स्व-विकासाची पूर्ण संधी मिळावी यासाठी सुकन्या योजना, पीडित, अन्यायग्रस्त महिला आणि बालकांना आर्थिक साहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनोधैर्य योजना राज्य शासनाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
जिल्ह्यात यावर्षी आपण स्वर्ण जयंती राजस्व अभियान अधिक व्यापक व विस्तारित स्वरुपात राबविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून चव्हाण यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही अनेक विकासकामे गावोगावी होत असल्याचे आवर्जून नमूद केले.
समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. रमाई आवास योजना, विमुक्त भटक्या समाजाकरिता विशेष प्रयत्न, व्यसनमुक्तीचे धोरण आपण तयार केले आहे. नुकताच राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायदा केला आहे. पुरोगामी राज्य अशी ओळख कायम ठेवणारा हा निर्णय असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य शासनाने अनेक चांगले निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. कामधेनू दत्तक ग्राम योजना, अंडी उबवण संयंत्राचे वाटप, दुधाळ जनावरांचे वाटप, मांसल कुक्कुट पक्षीपालन योजना, वैरण विकास कार्यक्रम, आधुनिक मत्स्यबाजारपेठ उभारणी अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. मराठवाड्यात दुध व्यवसायाला गती मिळावी यासाठी आपण न्यू जनरेशन को ऑपरेटीव्ह धर्तीवर संकलन व्यवस्था निर्माण करीत आहोत. त्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाशी नुकताच सामंजस्य करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सावकारांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी जुना सावकारी कायदा अपुरा पडतो. त्यामुळे प्रभावशाली व परिणामकारक नियमन करणारा नवा कायदा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ग्रामसभेत या कायद्यातील तरतूदींच्या वाचनामुळे या कायद्याविषयी जागृती होऊन सावकारापासून होणाऱ्या आर्थिक पिळवणूकीस प्रतिबंध होणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान, हरित महाराष्ट्र अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
या समारंभासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान ध्वजारोहणानंतर पोलीस उप अधीक्षक एम. राजकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शानदार संचलन केले. या संचलनात पोलीस पुरुष,महिला, होमगार्ड, पुरुष,महिला,एन सी सी ,पोलीस बॅन्ड पथक, वाहक नियंत्रणा शाखा, भोसले हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कुल, जिल्हा परिषद (कन्या) शाळा, भारत विद्यालयाचे एन. सी .सी. पथक, तेरणा पब्लीक हायस्कुल, शरद पवार हायस्कुल यांचे पथकही सहभागी झाले होते. याशिवाय पोलीस श्वानपथक, पोलीस व्रज वाहन, महिला छेडछाड विरोधी पथक, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, दंगल नियंत्रण पथक, पोलीस बॉम्बशोधक व नाशक पथक, आरोग्य, सामाजिक वनीकरण, निर्मल भारत अभियान, वन विभाग, सर्व शिक्षा अभियान, जिल्हा शासकीय रुगणालय, कृषि विभाग, महसूल विभाग,एस. टी. महामंडळ, अग्निशमन दलाच्या चित्ररथ पथकांनी यात सहभाग घेतला.
सुरुवातीला लिटल स्टार प्राथमिक शाळेचे लेझिम पथक व एकलव्य आश्रमशाळा यमगरवाडी यांच्या झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारत स्काऊड आणि गाईड यांनी चाचणी शिबीरात यशस्वी झाल्याबद्दल संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनींना पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करणत आले. नर्सिंग व मिडवायफरींग परिक्षेत महाराष्ट्रातून प्रथम व व्दितीय आलेल्या प्रियंका पोळे व रुपाली घोंगडे यांचा तर जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्काराबद्दल स्नेहल खामितकर, शाम जाधवर, आणि मोहन पाटील तसेच लुधियाना येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात लोकनृत्यात राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करणारा उस्मानाबादचा संघ सम्राट नाटय व सांस्कृकि मंडळाचे प्रमुख विशाल शिंगाडे व सहकाऱ्यांचाही पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पोलीस मुख्यालयाच्या आवारात पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत प्रांगणात अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.