सोलापूर :- जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शासकीय अधिकारी या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप सोलप यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त शहर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, होमगार्डचे जिल्हा समादेशक राजीव देसाई उपस्थित होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री सोपल म्हणाले की, देशाने स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रात चौफेर अशी प्रगती केली आहे. त्याचबरोबरच भारताची आर्थिक महासत्ता होण्यासाठी दमदार वाटचाल सुरु आहे. देशाच्या प्रगतीबरोबरच महाराष्ट्रानेही विविध क्षेत्रात नेत्रदिपक अशी वाटचाल करुन देशातील एक प्रगत राज्य म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
दोन वर्ष सतत पाऊस कमी झाल्याने मागील वर्षी जिल्ह्याला अतिशय तीव्र अशा टंचाई परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यावर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे यशस्वीपणे मात करु शकलो. जिल्ह्यातील जनतेला व पशुधनासाठी 673 टँकर्सपर्यंत जावून पाणी पुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात अशा प्रकारची टंचाई उदभवू नये यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखळी सिमेंट बंधा-यांची निर्मिती करण्यात आली. महात्मा फुले जलभूमी अभियानाद्वारे लोकसहभागातून व शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील विविध तलाव / प्रकल्पातील मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील एक गावाची निवड करुन कोरडवाहू शेती अभियान राबविण्यात येत आहे तसेच टंचाईग्रस्त परिस्थितीत फळबाग जगविण्यासाठी पुन:र्जीवन पॅकेज अंतर्गत शेतक-यांना सुमारे 101 कोटी रुपयाच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. यापुढे सर्वांनी ठिंबक सिंचनाकडे वळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 30 गावांतील 508 खंडकरी शेतक-यांना 6 हजार एकर जमिनीचे वाटप करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 415 खंडकरी शेतक-यांना सुमारे 4718 एकर गुंठे जमिनीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात 31 जानेवारी 2014 पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंमलबजावणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातही या कार्यक्रमाची सुरुवात 1 फेब्रुवारी 2014 पासून होत आहे. याचा जिल्ह्यातील सुमारे 28 लाखाहून अधिक लोकसंख्येला याचा लाभ मिळणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
जिल्ह्यातील नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यासाठी 373 हेक्टर आर जमिन संपादनाचे काम पूर्ण करण्यात आले असून याचा ताबा वन विभागाला देण्यात आला आहे. या माळढोक पक्षी अभयारण्यासाठी आवश्यक असणारे क्षेत्र निश्चित करुन प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आल्याचेही ते म्हणाले.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा बलाची बटालियनसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात टाकळी येथे तर अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे सशस्त्र सीमा बटालियन करीताही जमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुणांना देशसेवेची संधी भविष्यात उपलब्ध होणार असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
जिल्ह्याच्या विकासाला गती यावी यासाठी सोलापूर - पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 च्या 250 कि.मी. लांबीच्या महत्वाच्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम फेब्रुवारी 14 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सोलापूर-हैद्राबादचा जवळपास 350 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणासाठी 80 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे.
बोरामणी प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे साडे पाचशे हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 300 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. या सर्व बाबींचा फायदा जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना आपला माल पाठविण्यासाठी होईल, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात विमानतळ महत्वपूर्ण ठरणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यातील या विविध महत्वपूर्ण कामाबरोबर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणा-या पंढरपूर तिर्थक्षेत्र विकासासाठीही शासनाने विशेष लक्ष दिले आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चतु:शताब्दी तिर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाने मंजुर केला आहे. या आराखड्या अंतर्गत पंढरपूरसाठी सुमारे 253 कोटी रुपयाचा आराखडा मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये वारकरी / भाविकांचे सोयीसाठी पंढरपूर शहरातील महत्वाचे रस्ते, पुलांचे बांधकाम, पाणीपुरवठा, वाहनतळ, सार्वजनिक स्वच्छतागृह, परिक्रमा मार्ग आदि कामांचा समावेश आहे. या पैकी आतापर्यंत सुमारे 84.96 कोटी रुपयाची कामे जवळपास पूर्णत्वाकडे आहेत. तसेच केंद्राकडून पर्यटन वाढावे म्हणुनही विशेष निधी जिल्ह्यातील पर्यटन केंद्रासाठी मंजूर करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला.
नुकताच सावकारी नियंत्रणाचा कडक कायदा महाराष्ट्राने केला आहे त्यामूळे अन्यायग्रस्तांना अधिक न्याय मिळेल असेही पालकमंत्री शेवटी म्हणाले.
यावेळी ध्वजदिन निधी 100 टक्के पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांचा आणि ग्रामीण वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक भास्कर थोरात यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. परेड संचलनातसंचलन केलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाच्या पुरुष पोलीस गटास प्रथम क्रमांकाचे पोलीस आयुक्तालयाच्या महिला पोलीस गटास तर जय जवान जय किसान छोट्या गटास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम पत्रकार पुरस्कार स्पर्धेत विभागीय स्तराचा द्वितीय पुरस्कार दै. लोकमतचे शिवाजी सुरवसे जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त दै. संचारचे अनिल कदम आणि द्वितीय पुरस्कार प्राप्त पत्रकार विठ्ठल खेळगी यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा पुरस्कार आणि राष्ट्रीय हरित सेना पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास सर्व शासकीय अधिकारी ,कर्मचारी व राजकीय नेत्यांसह प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त शहर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, होमगार्डचे जिल्हा समादेशक राजीव देसाई उपस्थित होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री सोपल म्हणाले की, देशाने स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रात चौफेर अशी प्रगती केली आहे. त्याचबरोबरच भारताची आर्थिक महासत्ता होण्यासाठी दमदार वाटचाल सुरु आहे. देशाच्या प्रगतीबरोबरच महाराष्ट्रानेही विविध क्षेत्रात नेत्रदिपक अशी वाटचाल करुन देशातील एक प्रगत राज्य म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
दोन वर्ष सतत पाऊस कमी झाल्याने मागील वर्षी जिल्ह्याला अतिशय तीव्र अशा टंचाई परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यावर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे यशस्वीपणे मात करु शकलो. जिल्ह्यातील जनतेला व पशुधनासाठी 673 टँकर्सपर्यंत जावून पाणी पुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात अशा प्रकारची टंचाई उदभवू नये यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखळी सिमेंट बंधा-यांची निर्मिती करण्यात आली. महात्मा फुले जलभूमी अभियानाद्वारे लोकसहभागातून व शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील विविध तलाव / प्रकल्पातील मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील एक गावाची निवड करुन कोरडवाहू शेती अभियान राबविण्यात येत आहे तसेच टंचाईग्रस्त परिस्थितीत फळबाग जगविण्यासाठी पुन:र्जीवन पॅकेज अंतर्गत शेतक-यांना सुमारे 101 कोटी रुपयाच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. यापुढे सर्वांनी ठिंबक सिंचनाकडे वळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 30 गावांतील 508 खंडकरी शेतक-यांना 6 हजार एकर जमिनीचे वाटप करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 415 खंडकरी शेतक-यांना सुमारे 4718 एकर गुंठे जमिनीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात 31 जानेवारी 2014 पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंमलबजावणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातही या कार्यक्रमाची सुरुवात 1 फेब्रुवारी 2014 पासून होत आहे. याचा जिल्ह्यातील सुमारे 28 लाखाहून अधिक लोकसंख्येला याचा लाभ मिळणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
जिल्ह्यातील नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यासाठी 373 हेक्टर आर जमिन संपादनाचे काम पूर्ण करण्यात आले असून याचा ताबा वन विभागाला देण्यात आला आहे. या माळढोक पक्षी अभयारण्यासाठी आवश्यक असणारे क्षेत्र निश्चित करुन प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आल्याचेही ते म्हणाले.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा बलाची बटालियनसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात टाकळी येथे तर अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे सशस्त्र सीमा बटालियन करीताही जमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुणांना देशसेवेची संधी भविष्यात उपलब्ध होणार असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
जिल्ह्याच्या विकासाला गती यावी यासाठी सोलापूर - पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 च्या 250 कि.मी. लांबीच्या महत्वाच्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम फेब्रुवारी 14 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सोलापूर-हैद्राबादचा जवळपास 350 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणासाठी 80 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे.
बोरामणी प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे साडे पाचशे हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 300 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. या सर्व बाबींचा फायदा जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना आपला माल पाठविण्यासाठी होईल, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात विमानतळ महत्वपूर्ण ठरणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यातील या विविध महत्वपूर्ण कामाबरोबर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणा-या पंढरपूर तिर्थक्षेत्र विकासासाठीही शासनाने विशेष लक्ष दिले आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चतु:शताब्दी तिर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाने मंजुर केला आहे. या आराखड्या अंतर्गत पंढरपूरसाठी सुमारे 253 कोटी रुपयाचा आराखडा मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये वारकरी / भाविकांचे सोयीसाठी पंढरपूर शहरातील महत्वाचे रस्ते, पुलांचे बांधकाम, पाणीपुरवठा, वाहनतळ, सार्वजनिक स्वच्छतागृह, परिक्रमा मार्ग आदि कामांचा समावेश आहे. या पैकी आतापर्यंत सुमारे 84.96 कोटी रुपयाची कामे जवळपास पूर्णत्वाकडे आहेत. तसेच केंद्राकडून पर्यटन वाढावे म्हणुनही विशेष निधी जिल्ह्यातील पर्यटन केंद्रासाठी मंजूर करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला.
नुकताच सावकारी नियंत्रणाचा कडक कायदा महाराष्ट्राने केला आहे त्यामूळे अन्यायग्रस्तांना अधिक न्याय मिळेल असेही पालकमंत्री शेवटी म्हणाले.
यावेळी ध्वजदिन निधी 100 टक्के पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांचा आणि ग्रामीण वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक भास्कर थोरात यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. परेड संचलनातसंचलन केलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाच्या पुरुष पोलीस गटास प्रथम क्रमांकाचे पोलीस आयुक्तालयाच्या महिला पोलीस गटास तर जय जवान जय किसान छोट्या गटास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम पत्रकार पुरस्कार स्पर्धेत विभागीय स्तराचा द्वितीय पुरस्कार दै. लोकमतचे शिवाजी सुरवसे जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त दै. संचारचे अनिल कदम आणि द्वितीय पुरस्कार प्राप्त पत्रकार विठ्ठल खेळगी यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा पुरस्कार आणि राष्ट्रीय हरित सेना पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास सर्व शासकीय अधिकारी ,कर्मचारी व राजकीय नेत्यांसह प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.