पांगरी (गणेश गोडसे) :- देशाच्या संपन्नतेसाठी व प्रगतीसाठी मतदार जागृती अतिशय गरजेची असुन मतदार जागृत झाला तरच शासनावर अंकुश राहुन देश सुधारेल त्यासाठी प्रत्येक सज्ञान नागरिकाने मतदान करणे गरजेचे व देशाच्या हिताचे असल्याचे प्रतिपादन पांगरीचे मंडलाधिकारी एस.व्ही. बदे यांनी केले.
पांगरी ता.बार्शी येथील मंडल अधिकारी कार्यालयात आज दि. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात एस.व्ही. बदे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख हे होते. या कार्यक्रमात मतदारांना मतदान ओळखपत्र मतदाराचा अधिकार मतदार दिन साजरा करण्याचे महत्व याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. मतदानाचा हक्क बजावुन प्रत्येकाने योग्य निवड करावी असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला पांगरी गांव कामगार तलाठी किशोर राठोड, देविदास जगदाळे, अरूण गायकवाड, बुवा जानराव यांच्यासह बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.
पांगरी ता.बार्शी येथील मंडल अधिकारी कार्यालयात आज दि. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात एस.व्ही. बदे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख हे होते. या कार्यक्रमात मतदारांना मतदान ओळखपत्र मतदाराचा अधिकार मतदार दिन साजरा करण्याचे महत्व याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. मतदानाचा हक्क बजावुन प्रत्येकाने योग्य निवड करावी असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला पांगरी गांव कामगार तलाठी किशोर राठोड, देविदास जगदाळे, अरूण गायकवाड, बुवा जानराव यांच्यासह बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.