उस्मानाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह इतर मागणीसाठी युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या शिव-शाहु यात्रेचे शनिवार दि. २५ जानेवारी रोजी उस्मानाबादेत जंगी स्वागत करण्यात आले.
मराठा समाजांचा सरसकट ओ.बी.सीमध्ये समावेश करावा व त्यांना आरक्षण द्यावे, अरबी समुद्रात शिवस्मारक करावे, ऐतिहासीक गड किल्यांची पुर्णबांधणी करावी, इंदु मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत सुरु करावे, शिवराज्याभीषेक दिन राष्ट्रीय सण म्हणुन व्हावा, शेतक-यांना मोफत वीज देण्यात यावी, तरुणांना रोजगावर व उत्पन्नाची साधने उपलब्ध करुन द्यावीत आदी विषयावर आपले हुजन समाजामध्ये जागृती करण्यासाठी महीला व तरुणांचे प्रश्न समजावुन घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे हा दौरा करीत आहेत. दि. १४ जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ येथुन प्रारंभ झालेली या यात्रेचे शनिवार रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात आगमन झाले. लातुर जिल्ह्यातील नाईचाकुर येथुन उमरगा शहरात ही यात्रा येताच तेथे कार्यकर्त्यांनी या यात्रेचे जोरदार स्वागत केले. त्यांनतर ही यात्रा मुरुम, सालेगाव मार्ग लोहारा येथुन उस्मानाबाद शहरात आगमन झाले. यावेळी शहरातील आयुर्वेदीक महाविद्यालयापासून मोटारसायकल रॅली काढुन छत्रपती संभाजीराजे यांची मिरवणुक काढण्यात आली. त्यांनतर शहरातील शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या जल्लोषात संभाजी राजे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहरासह परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.
मराठा समाजांचा सरसकट ओ.बी.सीमध्ये समावेश करावा व त्यांना आरक्षण द्यावे, अरबी समुद्रात शिवस्मारक करावे, ऐतिहासीक गड किल्यांची पुर्णबांधणी करावी, इंदु मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत सुरु करावे, शिवराज्याभीषेक दिन राष्ट्रीय सण म्हणुन व्हावा, शेतक-यांना मोफत वीज देण्यात यावी, तरुणांना रोजगावर व उत्पन्नाची साधने उपलब्ध करुन द्यावीत आदी विषयावर आपले हुजन समाजामध्ये जागृती करण्यासाठी महीला व तरुणांचे प्रश्न समजावुन घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे हा दौरा करीत आहेत. दि. १४ जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ येथुन प्रारंभ झालेली या यात्रेचे शनिवार रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात आगमन झाले. लातुर जिल्ह्यातील नाईचाकुर येथुन उमरगा शहरात ही यात्रा येताच तेथे कार्यकर्त्यांनी या यात्रेचे जोरदार स्वागत केले. त्यांनतर ही यात्रा मुरुम, सालेगाव मार्ग लोहारा येथुन उस्मानाबाद शहरात आगमन झाले. यावेळी शहरातील आयुर्वेदीक महाविद्यालयापासून मोटारसायकल रॅली काढुन छत्रपती संभाजीराजे यांची मिरवणुक काढण्यात आली. त्यांनतर शहरातील शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या जल्लोषात संभाजी राजे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहरासह परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.