उस्मानाबाद :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी  दिनांक 30 जानेवारी रोजी दरवर्षी  संपूर्ण देशभर 2 मिनीटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. जिल्ह्यातही गुरुवार, ‍दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दोन मिनीटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा  दिन म्हणून पाळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दार दिली आहे .
     गुरुवारी, सकाळी 10 - 59 वाजेपासून 11 वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्यात येईल. हा इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालय/ आस्थापना/ शैक्षणिक संस्था/ विद्यापीठ यामधील अधिकारी/ कर्मचारी /शिक्षक/ शिक्षकतेत्र कर्मचारी /विद्यार्थी तसेच नागरीकांनी दोन मिनिटे मौन पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी  ठिक 11 वाजून 2 मिनीटांनी मौन संपल्यासंबधीचा इशारा भोंगा 11 वाजून 3 मिनीटापर्यंत वाजविण्यात येईल. जेथे भोंग्याची  व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे  ठिक 11 वाजता मौन पाळण्याबाबत योग्य ते निर्देश संबंधितांना देण्याबाबत  आणि  हुतात्म्यांना योग्य त्या आदराने आणि गंभीरपणे आदरांजली वाहण्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात  आले आहे. 
 
Top