बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील कृषि पर्यवेक्षक गजानन वसंत पाटील वय ५७, रा.सोमराई नगर मोहोळ यांना गारपीठग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे व्यवस्थीत न केल्याने चोप दिल्याची फिर्याद बार्शी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
तांदूळवाडी (ता.बार्शी) येथील शेतकरी अमोल उर्फ हनुमंत विष्णु गरड यांनी आपल्या नावावर पंचनामे करुन द्यावे यासाठी खुर्ची व शासकिय कागदपत्रे फेकून दिले, धक्काबुक्की केली व चष्मा फेकून दिल्याचे पाटील तक्रारीत म्हटले आहे. सदरच्या तक्रारीवरुन बार्शी पोलिसांत शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.कोटमाळे हे करीत आहेत.
तांदूळवाडी (ता.बार्शी) येथील शेतकरी अमोल उर्फ हनुमंत विष्णु गरड यांनी आपल्या नावावर पंचनामे करुन द्यावे यासाठी खुर्ची व शासकिय कागदपत्रे फेकून दिले, धक्काबुक्की केली व चष्मा फेकून दिल्याचे पाटील तक्रारीत म्हटले आहे. सदरच्या तक्रारीवरुन बार्शी पोलिसांत शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.कोटमाळे हे करीत आहेत.