आजकाल मला भेटणा-यांची
संख्‍या खूप वाढली
पाच वर्षानंतर पुन्‍हा एकदा
गाठ यांच्‍याशी पडली
मला ओळखणारे किती
याची मला जाणीव झाली
उमेदवाराचे प्रेम पाहून
माझी छाती भरुन आली
सगळ्यांनाच निवडून द्यावं
अस मला वाटतं
एकालाच निवडून देणं
कुठ मनाला पटतं

काल परवापर्यंत अनोळखी होते
आता मात्र ओळखीचे झाले
पाच वर्षाचा जाच आणि त्रास
वेडे मन विसरुन गेले
काल त्‍याची आज ह्याची
उद्या कोणाची पार्टी आहे
राजकारणीच नाही हो
मतदारसुध्‍दा डर्टी आहे

- भगवंत सुरवसे
 
Top