धनंजय सावंत
उस्मानाबाद :- जि.प.सभापती धनंजय सावंत यांनी आज शनिवार रोजी आपला उमेवदवारी अर्ज माघारी घेतला. त्‍यामुळे शिवसेनेतील बंडखोरी मात्र टळली आहे. पण भाजपाचे रोहन देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल, हे निश्चित आहे.
    उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ४१ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता,त्यापैकी दोघांचे अर्ज छाननीत नामंजूर झाले होते. उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस होता.पैकी १२ जणांनी माघार घेतल्याने आता २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. धनजंय सावंत यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज परत घेतला. यावेळी शिवसेनेचे उमेदवार रविंद्र गायकवाड,आ.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
 
Top