कळंब -: नागझरवाडी (ता. कळंब) येथील महिला शेतकरी मंगल अनंत लबाड (वय ४० वर्ष) यांनी दि. २८ मार्च रोजी त्यांच्या माहेरी मोहरवाडी (ता.जि.उस्मानाबाद) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
    गारपीट आणि पावसामुळे त्यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान झाले होते. सदर महिला शेतकरी लबाड यांच्याकडे बँकेचे कर्ज होते, शेतामधील पिके तर वाया गेले आता कर्ज कसे फेडायचे या भीतीने त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. कळंब तालुक्यात यापूर्वी मस्सा खंडेश्वरी येथील एक, शिंगोली येथील एक तर देवळाली येथील एका शेतकर्याने आत्महत्या केली होती. नागझरवाडीच्या महिला शेतक-यानी आत्महत्या केल्यामुळे तालुक्यात हळ हळ व्यक्त होत आहे.
 
Top