नवी दिल्ली -: आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच देशभर आचारसंहिता लागू झाली. यंदा प्रथमच 9 टप्प्यात मतदान होत आहे. 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान हे मतदान होईल. 16 मे ला देशातील सर्व 545 मतदारसंघात मतमोजणी होईल. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघासाठी 10, 17 आणि 24 एप्रिलला तीन टप्प्यात मतदान होईल. याचवेळी निवडणूक आयोगाने तेलंगणा, सीमाध्रं, ओडिशा, सिक्कीम या राज्यांतील विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या. देशातील हवामान व पावसाचा अंदाज घेऊनच वेळापत्रक तयार केल्याचे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त पी. व्ही संपत यांनी सांगितले.
सध्याच्या लोकसभेची मुदत एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे 31 मे 2014 पूर्व देशात निवडणुका होऊन नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी राष्ट्रपतींकडे देणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल. तर 12 मेला 9 व्या टप्प्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखांवरून 70 लाख रुपये करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात या तारखांना होईल मतदान
10 एप्रिलला तिस-या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, रामटेक, नागपूर, भंडारा-गोदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आदी 10 मतदारसंघात मतदान होईल.
17 एप्रिलला पाचव्या टप्प्यात हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 19 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल.
24 एप्रिल सहाव्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड इत्यादी 19 मतदारसंघात मतदान होईल.
सध्याच्या लोकसभेची मुदत एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे 31 मे 2014 पूर्व देशात निवडणुका होऊन नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी राष्ट्रपतींकडे देणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल. तर 12 मेला 9 व्या टप्प्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखांवरून 70 लाख रुपये करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात या तारखांना होईल मतदान
10 एप्रिलला तिस-या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, रामटेक, नागपूर, भंडारा-गोदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आदी 10 मतदारसंघात मतदान होईल.
17 एप्रिलला पाचव्या टप्प्यात हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 19 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल.
24 एप्रिल सहाव्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड इत्यादी 19 मतदारसंघात मतदान होईल.