पांगरी (गणेश गोडसे) :- शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असुन सवलतींचा फायदा सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन पुरी (ता.बार्शी) ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.लता पांडुरंग उपरे यांनी केले.
    बार्शी तालुक्‍यातील पुरी येथे शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ प्रसंगी सौ. लता उपरे हे बोलत होत्या. माजी सैनिक तुकाराम नामदेव झालटे व भास्कर आबा झालटे आदी मान्यवरांच्या हस्ते गावातील ग्राहकाला धान्याचे माप टाकुन शुभारंभ करन्यात आला.
  कार्यक्रमाला उपसरपंच अशोक लहु झालटे, ग्रामपंचायत सदस्या सौ. जनाबाई शहाजी दिडवळ, सौ.पदमीन बब्रुवान क्षिरसागर, सौ.नालंदा दिलीप पालके, यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ योजनेतील लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिगंबर क्षिरसागर यांनी केले.
 
Top