बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : वैराग ता.बार्शी येथील तरुणाचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्यानंतर वैराग परिसरात संपूर्ण दिवसभर बाजारपेठ बंद झाली, तणावाच्या वातावरणात संतप्त जमावाने संशयीताचे घर, दुकान, वाहने पेटवून दिल्याने उद्रेकाचे वातावरण तयार झाले.
विठ्ठल उर्फ इच्चप्पा मारुती पवार (वय ३०) असे यातील मयताचे नाव असून सुमारे वीस जणांच्या जमावाने तलवार, लोखंडी गज, काठ्या, दगड आदी हत्यारांचा वापर करुन विठ्ठल याचा खून झाल्याची फिर्याद मयताचा मामा सीताराम दिंडोरे यांनी वैराग पोलिसांत दिली आहे त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शनिवारी दि.२६ रोजी विठ्ठल, आरोपी शिवाजी आण्णा पवार यांच्या घरासमोरुन जातांना पूर्व वैमनस्यातून सोमनाथ पवार, धनंजय पवार, सतीश पवार, सुनिल पवार, बबलू पवार, राजाभाऊ पवार, अनिल पवार, बाबू पवार, नितीन पवार, तानाजी पवार, संतोष पवार, सागर पवार, सागर घुले, शशिकांत घोडे, नागेश धोत्रे, सुभाष पवार, संजय दिंडोरे, विजय दिंडोरे, विणु देवकर यांच्याशी संगनमत करुन मयत विठ्ठलच्या डोक्यात, हातावर, पायावर, तलवार, लोखंडी गज, काठ्या, दगड यांनी मारहाण करुन खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 
Top