बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील कवि कालिदास मंडळाच्या वतीने देण्यात येणार्‍या मेघदूत पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुमन चंद्रशेखर यांनी केले आहे.
    शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख २ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कै.दगडू बळी मस्तूद यांच्या स्मरणार्थ डॉ.कृष्णा मस्तूद यांच्या वतीने व डॉ.सूर्यकांत घुगरे यांच्या वतीने असे दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.
    मागील २१ वर्षांपासून या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. काव्य क्षेत्रासाठी सातत्याने कार्य करत कवितांना प्रोत्साहन देणारे महाराष्ट्रातील हे एकमेव मंडळ असून २९ जून रोजी यंदाच्या २२ व्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
Top