पांगरी (गणेश गोडसे) :- गाताचीवाडी (ता. बार्शी) येथे प्रतिवर्षीप्रमाणेच गुरुवार दि. 22  मे रोजी भव्य कानिफनाथ व मच्छिंद्रनाथ यात्रा मोहोत्सवानिमित्त पहाटेपासुनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन यावर्षी मात्र यात्रेनिमित्‍त पशुबळीवर बंदी घालन्याचा निर्णय गाताचीवाडी ग्रामस्थ व यात्रा कमिटीने घेतला असुन मंदिर परिसरात कोणीही पशुबळी देऊन त्याचा नैवैदय मंदिरात नेऊ नये, असे आवाहन यात्रा कमिटीचे बाबा घाडगे यांनी प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे केले आहे.
  गाताचीवाडी गावाजवळील बाहयवळन मार्गालगत असलेल्या कानिफनाथ मंदिरात गूरूवारी पहाटे चार वाजता काकडा आरती, सकाळी 9 वाजता उपस्थित भाविकांना यात्रा कमिटीतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येणार आहे. त्यानंतर चार वाजता शेरणी व नंतर कानिफनाथांना पुरणपोळीचा नैवैदय दाखवला जाणार आहे. नऊ नाथापैकीच एक असलेल्या कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त बार्शी तालुक्यासह सोलापुर, उस्मानाबाद जिल्हयातुन हजारो भाविक हजेरी लावत असतात. गाताचीवाडी ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या नाथांच्या यात्रेला ग्रामस्थ एकजुटीने विविध कार्यक्रम पार पाडतात. यावर्षी मात्र यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी विधायक निर्णय घेत पशुबळीच्या प्रचलीत प्रथेला बंदी घातल्यामुळे या निर्णयाचे समाजातील कांही वर्गातुन स्वागत होत असुन कांहीनी नाराजी व्यक्त केली आहे. यात्रा मोहोत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्‍यासाठी यात्रा कमिटीचे पदाधिकारी मधुकर गात, भाऊ गात, बाबा घाडगे, सरपंच विठ्ठल घाडगे, माजी सरपंच भाऊसाहेब घाडगे यांच्यासह गाताचीवाडी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
 
Top