कळंब -: सध्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश चालू आहेत. त्यासाठी उत्पन्नाचा दाखल लागतो. कळंब सेतू सुविधा केंद्राकडून उशीर लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तहसलिदारांनी याकडे लक्ष देऊन याकरीात वैयक्तीक नायब तहसिलदार या कामाासाठी नेमावा, तसेच विद्यार्थी व पालकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी राणाजगजितसिंह युवा प्रतिष्ठानच्यावतीने कळंब तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर शहराध्यक्ष शिवाजी कराळे, उमेश गायकवाड, सुजित भोसले, शुभम पाटील, सुयोग शिंदे, अभिजीत हारकर, योगेश रेणके आदींच्या स्वाक्ष-या आहेत.