उस्मानाबाद -: अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यातील अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. तरीही नगर पालिका व सार्वजिनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर परत अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. परत अतिक्रमण होऊ नये यासाठी पथकाची नियुक्ती करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांनी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद हद्दीतील वाहतूक व इतर विषयांचे नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.पाटील यांनी हे निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी भालचंद्र चाकूरकर, उपविभागीय अधिकारी शोभा राऊत, रविंद्र गुरव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक वृषाली तेलोरे, सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, रस्त्यांच्या अतिक्रमणाबाबत परत होणाऱ्या अतिक्रमणावर कायदेशीर कार्यवाही करावी. व्यावसायीकांच्या पूनर्वसनाचा आराखडा तयार करतांना जिल्ह्यातील नगर पालिका हद्दीत त्यांच्या ताब्यातील किती मोकळी आणखी किती जागा ताब्यात घ्यावयाची याबाबत तात्काळ सर्वे करावा. मोकळया जागेत हॉकर्स झोन व पार्कींग एरिया तयार करावा. याबाबत नगर पालिकांनी सर्व साधारण सभेत हा विषय ठेवून मंजूर करुन घ्यावा , या जागेची नोंद सिटी सर्वेला घेण्यात यावी. याचबरोबर टू-एन-वन वाहनाचे टेंडर काढणे, जॅमर, ताबा पावती घेऊन त्या मोकळया जागेची प्रशासनाकडून रितसर नोंदणी करुन घ्यावी. टॅक्सी व रिक्षा स्टँड व्यवस्थेसाठी पार्कींग करणे, दराचे बोर्ड लावणे, दिशा दर्शक फलक लावण्याचे, निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील वाहतूक नियत्रणांसाठी एनसीसी, एनएसएस, स्काऊट अॅड गाईडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याबरोबरच नगर पालिका क्षेत्रामध्ये सर्वांच्या सहकार्याने 15 जुलै,2014 रोजी वृक्ष लागवड दिन साजरा करुन जास्तीत जास्त झाडे लावण्याचे उदिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद हद्दीतील वाहतूक व इतर विषयांचे नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.पाटील यांनी हे निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी भालचंद्र चाकूरकर, उपविभागीय अधिकारी शोभा राऊत, रविंद्र गुरव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक वृषाली तेलोरे, सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, रस्त्यांच्या अतिक्रमणाबाबत परत होणाऱ्या अतिक्रमणावर कायदेशीर कार्यवाही करावी. व्यावसायीकांच्या पूनर्वसनाचा आराखडा तयार करतांना जिल्ह्यातील नगर पालिका हद्दीत त्यांच्या ताब्यातील किती मोकळी आणखी किती जागा ताब्यात घ्यावयाची याबाबत तात्काळ सर्वे करावा. मोकळया जागेत हॉकर्स झोन व पार्कींग एरिया तयार करावा. याबाबत नगर पालिकांनी सर्व साधारण सभेत हा विषय ठेवून मंजूर करुन घ्यावा , या जागेची नोंद सिटी सर्वेला घेण्यात यावी. याचबरोबर टू-एन-वन वाहनाचे टेंडर काढणे, जॅमर, ताबा पावती घेऊन त्या मोकळया जागेची प्रशासनाकडून रितसर नोंदणी करुन घ्यावी. टॅक्सी व रिक्षा स्टँड व्यवस्थेसाठी पार्कींग करणे, दराचे बोर्ड लावणे, दिशा दर्शक फलक लावण्याचे, निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील वाहतूक नियत्रणांसाठी एनसीसी, एनएसएस, स्काऊट अॅड गाईडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याबरोबरच नगर पालिका क्षेत्रामध्ये सर्वांच्या सहकार्याने 15 जुलै,2014 रोजी वृक्ष लागवड दिन साजरा करुन जास्तीत जास्त झाडे लावण्याचे उदिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.