उस्मानाबाद :- महसूल यंत्रणेत तलाठी हा गावपातळीवरील सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याच्याकडे असणारे अभिलेखे अद्यावत असणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांनी त्यांचे दफ्तर आणि रेकॉर्ड अद्यावत ठेवावे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत गैरशिस्त आणि कामातील दिरंगाई सहन करण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.
येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जिल्ह्यातील तलाठ्यांची ई- महाभूमी योजनेसंदर्भात कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय अधिकारी सर्वश्री शोभा राऊत, रवींद्र गुरव, सचिन बारवकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. कौंडेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, महसूल रेकॉर्ड अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम जरुरी आहे. महसूल यंत्रणा ही महत्वाची यंत्रणा आहे. अशावेळी त्यातील रेकॉर्ड बिनचूक असणे आवश्यक आहे. तलाठ्यांनी त्यांच्या कामाच सखोल ज्ञान मिळवून त्याचा उपयोग करणे गरजेचे आहे. तलाठी हा महसूल यंत्रणेचा गावपातळीवरील प्रमुख आहे. त्याने त्याच्या कामातून ते प्रमुखपद टिकवले पाहिजे. प्रत्येक तलाठ्यांनी त्यांच्या सज्जांत नियमित उपस्थित राहणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शिस्त या दोन गोष्टी काम करताना आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण या ई-महाभूमी कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे. याशिवाय गाव नमुन्यांचे संगणकीकरण करण्यासाठी ई-चावडी ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. तसेच फेरफार प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. यामुळे महसूल विभागाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता येणार आहे. कोठेही आणि केव्हाही विनाविलंब भूमी अभिलेख उपलब्ध होणार आहेत. आपला जिल्हा हा राज्यात या बाबींत आघाडीवर असून येत्या सहा महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील महसूल अभिलेख्यांचे अद्यावतीकरण करण्याचा प्रयत्न सर्व तलाठ्यांनी करावा. त्यासाठीची संपूर्ण सहायता वरिष्ठ अधिका-यांमार्फत देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ई-फेरफारसाठी राज्यातून कळंब तहसील कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिवसभराच्या या कार्यशाळेत विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जिल्ह्यातील तलाठ्यांची ई- महाभूमी योजनेसंदर्भात कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय अधिकारी सर्वश्री शोभा राऊत, रवींद्र गुरव, सचिन बारवकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. कौंडेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, महसूल रेकॉर्ड अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम जरुरी आहे. महसूल यंत्रणा ही महत्वाची यंत्रणा आहे. अशावेळी त्यातील रेकॉर्ड बिनचूक असणे आवश्यक आहे. तलाठ्यांनी त्यांच्या कामाच सखोल ज्ञान मिळवून त्याचा उपयोग करणे गरजेचे आहे. तलाठी हा महसूल यंत्रणेचा गावपातळीवरील प्रमुख आहे. त्याने त्याच्या कामातून ते प्रमुखपद टिकवले पाहिजे. प्रत्येक तलाठ्यांनी त्यांच्या सज्जांत नियमित उपस्थित राहणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शिस्त या दोन गोष्टी काम करताना आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण या ई-महाभूमी कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे. याशिवाय गाव नमुन्यांचे संगणकीकरण करण्यासाठी ई-चावडी ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. तसेच फेरफार प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. यामुळे महसूल विभागाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता येणार आहे. कोठेही आणि केव्हाही विनाविलंब भूमी अभिलेख उपलब्ध होणार आहेत. आपला जिल्हा हा राज्यात या बाबींत आघाडीवर असून येत्या सहा महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील महसूल अभिलेख्यांचे अद्यावतीकरण करण्याचा प्रयत्न सर्व तलाठ्यांनी करावा. त्यासाठीची संपूर्ण सहायता वरिष्ठ अधिका-यांमार्फत देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ई-फेरफारसाठी राज्यातून कळंब तहसील कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिवसभराच्या या कार्यशाळेत विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.