उस्मानाबाद :- चर्मकार समाज व दलित समाजाच्या उध्दारासाठी काम करीत असलेल्या व्यक्तीच्या  कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरुन सामाजिक उत्थापनासाठी कार्यकर्ते व संस्था सरसावून पुढे यावेत, यासाठी शासनामार्फत संत रोहिदास पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी  संबंधितांनी आपला प्रस्ताव 8 जुलै पर्यत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद यांच्या नावे पाठवावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, उस्मानाबाद यांनी केले आहे.
जिल्ह्यातील चर्मकार व दलित समाज आदि समाजातील दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक अशा एका व्यक्तीला पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी पात्रता व निवडीचे निकष यानुसार आहेत. चर्मकार व दलित समाज आदि सामाजिक दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी  झटणारे नामवंत समाज सेवक असावेत, सामाजिक कल्याण क्षेत्रात कमीत कमी 25 वर्षे कार्य केलेले असावेत, पुरुषाचे वय 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वय असावे, स्त्रीसाठीचे 40 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. कोणत्याही व्यक्तीस त्यांचे आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही.
हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र या गोष्टीचा विचार केला जाणार नाही, या पुरस्कारासाठी आमदार/खासदार/जिल्हा परिषद सभापती किंवा कोणताही पदाधिकारी पात्र असणार नाही. पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, आपण केलेल्या उकृष्‍ट कार्याचा तपशिल, विना दुाराचार प्रमाणपत्र गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलीस विभागाचे प्रमाणपत्र, इतर पुराव्याचे  कागदपत्रे, कात्रणे व तीन पासपोर्ट आकाराचे फोटो आदि माहितीसह प्रस्ताव परिपुर्ण मुदतीत पाठवावेत. अर्जाचा नमुना उपलब्ध असून अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 02472-222014 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.*****
 
Top