पांगरी (गणेश गोडसे) :- रूसलेल्या वरूणराजाची मनधरणी करण्यासाठी शेतक-यांसह सर्वसामान्य नागरीकांकडुनही मोठे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणुन पांगरी (ता. बार्शी) येथील बेलखोरी शिवप्रेमी मित्रमंडळ व पांगरी ग्रामस्थ भाविक यांच्या संयुक्त विद्यमाने बेलखोरी महादेव मंदिरात पहाटेपासुन दिवसभर भजन, किर्तन, अभिषेक आदी विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले.
पांगरीपासुनच जवळच्याच घनदाट जंगलात असलेल्या बेलखोरी महादेव देवस्थानावर भाविकांची मोठी श्रदधा असुन धार्मिक भावना कमी होत चालल्यामुळे वरूणराजा जनतेची प्रतिक्षा बघत असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत देवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक भक्तांतर्फे बेलखोरी महादेव मंदिरासमोर दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच उर्वरीत महाप्रसाद पांगरी गावात आणुन घरोघरी त्याचे वाटप करण्यात आले. सोमवारी दिवसभर भाविक भक्तांसह पांगरीतील भजनी मंडळ, ग्रामस्थ, शेतकरी यांनी इश्वराची आराधना करून वरूणराजाला बरसण्याची विनंती केली.
गतवर्षीही पांगरी ग्रामस्थांनी निलकंठेश्वर मंदिरातुन रूसुन गेलेल्या महादेवांना बेलखोरी येथुन नंदीसह टाळ, मृदंग आदी वादयांसह जावुन आराधना करून परत निलकंठेश्वर मंदिरात घेऊन आले होते. ज्या दिवशी निलकंठेश्वर मंदिरात आले होते त्याच दिवशी योगायोगाने रात्री वरूणराजा चांगलाच बरसला होता. त्यामुळे यावर्षीही भाविकांनी महाप्रसादाचे वाटप केले. महाप्रसाद आयोजन केल्यामुळे आता वरूणराजा बरसेल असा आशावाद ग्रामस्थ धरून आहेत. महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांगरी ग्रामस्थांसह शिवप्रेमी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
जनतेसह शेतक-यांचे डोळे हे फक्त आकाशाकडेच लागुन राहिलेले आहेत. पावसाअभावी जनजीवन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
पांगरीपासुनच जवळच्याच घनदाट जंगलात असलेल्या बेलखोरी महादेव देवस्थानावर भाविकांची मोठी श्रदधा असुन धार्मिक भावना कमी होत चालल्यामुळे वरूणराजा जनतेची प्रतिक्षा बघत असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत देवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक भक्तांतर्फे बेलखोरी महादेव मंदिरासमोर दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच उर्वरीत महाप्रसाद पांगरी गावात आणुन घरोघरी त्याचे वाटप करण्यात आले. सोमवारी दिवसभर भाविक भक्तांसह पांगरीतील भजनी मंडळ, ग्रामस्थ, शेतकरी यांनी इश्वराची आराधना करून वरूणराजाला बरसण्याची विनंती केली.
गतवर्षीही पांगरी ग्रामस्थांनी निलकंठेश्वर मंदिरातुन रूसुन गेलेल्या महादेवांना बेलखोरी येथुन नंदीसह टाळ, मृदंग आदी वादयांसह जावुन आराधना करून परत निलकंठेश्वर मंदिरात घेऊन आले होते. ज्या दिवशी निलकंठेश्वर मंदिरात आले होते त्याच दिवशी योगायोगाने रात्री वरूणराजा चांगलाच बरसला होता. त्यामुळे यावर्षीही भाविकांनी महाप्रसादाचे वाटप केले. महाप्रसाद आयोजन केल्यामुळे आता वरूणराजा बरसेल असा आशावाद ग्रामस्थ धरून आहेत. महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांगरी ग्रामस्थांसह शिवप्रेमी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
जनतेसह शेतक-यांचे डोळे हे फक्त आकाशाकडेच लागुन राहिलेले आहेत. पावसाअभावी जनजीवन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.